Headlines

क्रॉसिंगची कटकट मिटणार,110 किमीचा “सुपरफास्ट’ वेग आता फक्त 16किमी दूर:अकोळनेर-निंबळक हायस्पीड चाचणी यशस्वी; 30 मे रोजी अंतिम चाचणी

. अहिल्यानगर-दौंड रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे “सुपरफास्ट’ स्वप्न आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मार्गावरील गाड्यांचा ११० ते १३० किलोमीटरचा वेग आता अहिल्यानगरपासून अवघा १६ किलोमीटर दूर आहे. अहिल्यानगर-दौंड दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अकोळनेर ते निंबळक या १८.२१ किलोमीटर अंतरावरील पाचव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी सोमवारी (१८ मे) ताशी १३० किमी वेगाने यशस्वीरीत्या पार…

Read More

दिव्यज्योतच्या घोटाळ्यातील संशयिताला पोलिस कोठडी; आकडा 75 लाखांवर

विंचूर येथील दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिलांना विविध वस्तू व सरकारी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित विशाल गरुड याला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. १८) सुमारे १३ लाख रुपयांच्या नव्या तक्रारी दाखल झाल्याने फसवणुकीची एकूण रक्कम ७५ लाख रुपयांहून अधिक झाली आहे. दिव्यज्योत…

Read More

अमळनेर शिवारामध्ये शेतकऱ्यांचे रात्रीपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरू:जायकवाडी जल फुगवट्याचे पाणी थेट शेतात असल्याचा केला आरोप‎

जायकवाडी जल फुगवट्याचे पाणी वीस वर्षांपासून असंपादित अमळनेर-लखमापूरच्या शेतात येत असून, उभी पिके मातीमोल झाली आहे. प्रशासन वेळकाढू भूमिका घेत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी अमळनेर शिवारात सोमवारी (१८ मे) सकाळी साडेअकरा वाजेपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जायकवाडी जल फुगवट्यामुळे उभ्या पिकांचे १०० टक्के नुकसान होते….

Read More

देवस्थान इनाम जमीन कायद्याला अष्टविनायक विश्वस्तांचा विरोध:नव्या कायद्याने मंदिरांच्या इनामी जमिनी भूमाफियांच्या घशात जाणार, विश्वस्तांचा दावा

महायुती सरकारने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे ५ जून २०२६ पर्यंत हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. या कायद्यातील संभाव्य तरतुदी पाहून अब्जावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिराचे विश्वस्त संतप्त झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, या नव्या कायद्यातील तरतुदींमुळे मंदिरांचे उत्पन्नाचे साधन नष्ट…

Read More

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र, अद्याप तोडगा नाही:पुढच्या टप्प्यात धरणे, मोर्चा; आज द्वारसभा झाली

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी १४ मे पासून श्रृंखलाबद्ध आंदोलन सुरू केले आहे. शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघाने येत्या काळात लढा अधिक तीव्र करण्याची तयारी केली आहे. याच क्रमात आज, सोमवारी द्वारसभा घेण्यात आली. शासनाकडून मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे….

Read More

धन्वंतरी रुग्णालयात 40 वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक:15 जागांचे निकाल जाहीर, 6 उमेदवार बिनविरोध विजयी

गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच अमरावती येथील धन्वंतरी सहकारी रुग्णालय सहकारी संस्थेची (दसरा मैदानजवळ, बडनेरा रोड) निवडणूक पार पडली. सोमवारी दुपारी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. १७ मे रोजी झालेल्या मतदानात ३ हजार १७१ मतदारांपैकी १ हजार ३३८ (४२.१९ टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला होता. कॅम्प परिसरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला…

Read More

काँग्रेसचे दर्यापूर तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांचा राजीनामा:खासदार वानखडे आणि जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त

दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अलिकडेच झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीपासूनच दर्यापूर काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी सुरू होत्या. भारसाकळे यांनी खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. यापूर्वी जिल्हा…

Read More

Daund SRPF Exam Cancelled; 85 Questions Leaked from Coaching Class

राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट क्रमांक ५, दौंड येथील सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. गेल्या २ मे रोजी झालेल्या या परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खाजगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातातून जसेच् . एसआरपीएफ-5 या गटाची 100 गुणांची लेखी परीक्षा २ मे शनिवारी इंदापूरच्या एका महाविद्यालयात…

Read More

किसान काँग्रेसचे पालकमंत्री शिरसाट यांच्या विरोधात आंदोलन:मका, कापूस खरेदीच्या प्रश्नांवर अडथळा आणल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अडथळा आणल्याच्या निषेधार्थ किसान काँग्रेसने आज (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. मका आणि कापूस खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. किसान काँग्रेसने पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना त्यांना बोलण्यापासून रोखल्याने शेतकरी…

Read More

हिंगोली जिल्ह्यात डिझेलची अचानक मागणी वाढल्याने टंचाई:वाहनधारकांनी आवश्यक तेवढेच डिझेल घ्यावे, प्रशासनाचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात डिझेलची अचानक मागणी वाढली असून त्यामुळे डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा सुरळीत होत असून वाहनधारकांनी आवश्यक तेवढे डिझेल भरावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील पंधरा दिवसापासून डिझेलची मागणी अचानक वाढली आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून नांगरणी व…

Read More