Headlines

कोरफळे हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता:बाेधले महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यास हजारो भक्तांचा सहभाग‎

छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरफळे ( ता. बार्शी) येथील आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी गुरूवर्य डॉ जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने अतिशय धार्मिक व भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी कोरफळे व परिसरातील गावातील हजारो भक्त उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या काळात…

Read More

उन्हाळ्यामध्ये कार्बोनेटेड पेय कटाक्षाने टाळा:आहारतज्ज्ञांचे मत, नैसर्गिक, फळांचे पेय, पदार्थांचा आहारात समावेश करण्याच्या सूचना‎

उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा, त्यातल्या त्यात विदर्भाचा उन्हाळा म्हटल की आग ओकणारा सूर्य कोणालाही शहारे आणतो. अशा उन्हाळ्यात आपल्या स्वास्थ्याची योग्य काळजी घेण्याची विशेष आवश्यकता आहे. कारण, उन्हाळात पचन शक्ती ही काहीशी कमकुवत होते. परिणामी पचन शक्ती कायम ठेवत आरोग्य लाभ व्हावा, यासाठी आपण दक्ष राहणे गरजेचे आहे. रसाळ, मधूर फळे, हिरव्या मोसमी पालेभाज्या…

Read More

अमरावती शहरात रंगला ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस:संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाने राबवला अनोखा उपक्रम‎

ज्येष्ठ नागरिक हे ज्ञानाचे भांडार असून त्यांच्या अनुभवाची गरज कुटुंबासोबतच समाजालाही आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी हे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवावे, असे आवाहन संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष डी. एस. पवार यांनी केले. . संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने माहे एप्रिलमध्ये वाढदिवस झालेल्या सभासदांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम येथील विरंगुळा केंद्रात मोठ्या दीमाखात पार पडला. यावेळी ते…

Read More

तुटलेली खेळणी, झाडे सुकली, कचरा साचला:106 उद्यानांची कंत्राटे रखडली, दुरवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक, बंच्चे कंपनीने फिरवली पाठ‎

महानगरपालिका क्षेत्रात मनपाची २१८ उद्याने असून त्यापैकी १०६ उद्याने कंत्राटी तत्त्वावर दिली जातात. परंतु, जुने कंत्राट संपुष्टात आल्यानंतर नवी कंत्राटी प्रक्रियाच गेल्या काही वर्षांपासून रखडल्यामुळे मनपाच्या बहुतेक उद्यानांची दुर्दशा झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. मोकळ्या जागेत लॉन नाही. गवतही उद्यानात दिसत नाही. फुलझाडे तर शोधूनही सापडली नाहीत. उद्यान म्हटले की सर्वत्र हिरवी झाडे, फुले, खेळणी,…

Read More

शहरातील वाहतुकीच्या गंभीर समस्येवर उपाययोजना हव्यात, उपमहापौरांचे पोलिस आयुक्तांना निवेदन, कारवाईची मागणी‎

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून मुख्य चौक, बाजारपेठा, शाळा परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच मोठ्या संख्येने वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बरोबरीनेच शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची उणीव असल्याने नागरिकांना…

Read More

सुधारित निवृत्तीवेतन योजनेचे पडसाद; जुनी पेन्शन लागू न झाल्यास आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक; आरडीसींना दिले निवेदन‎

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेविरोधात सोमवारी पडसाद उमटले. या योजनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. या योजनेतील तरतुदी कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधात असून त्या पूर्णतः अन्यायकारक व दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठाम आरोप संघटनेने केला…

Read More

"भोंदु गुरू माऊली'चा विशेष तपास, धाराशिवनंतर पंढरीतून तिसरी तक्रार:समाजमाध्यमावरील छबी डिलीट, धाराशिवच्या भक्ताचा नोंदवला जबाब‎

कासव देऊन पाठीमागील पीडा दूर करण्याचा दावा करून अनेक भक्तांची आर्थिक लुट करणारा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली याने अनेकांची फसवणूक करुन आर्थिक लुट केल्याचे प्रकरणे समोर येऊ लागली असून रविवारी दि १० रोजी धाराशिव आणि सोमवार दि.११ मे रोजी पंढरपूरच्या पिडीत भक्तांने आपलीही फसगत झाल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली असून त्याची पडताळणी करण्याचे काम…

Read More

अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याची प्रचंड दुरावस्था:पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा, निधीअभावी जनतेला चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवता येणार नाही‎

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग ७५३-एफ वरील खड्डे आणि दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘निधीअभावी जनतेला चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवता येणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली असून पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. नीरज धोटे…

Read More

ग्रंथदानातून उभारले जाणार ज्ञानालय; नाकोडे विद्यालयाचा अभिनव उपक्रम:जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार वाचनालय‎

ग्रंथदान हेच श्रेष्ठदान ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नाकोडे येथील मविप्र समाजाच्या शाळांनी अभिनव ग्रंथदान अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठी वाचनालय सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण भागात वाचन संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ३०० पुस्तके देण्यासाठी २० नागरिकांनी…

Read More

“सोनबर्डी स्विमिंग पूल’ दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा:जामनेर नगरपालिकेला राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे निवेदन‎

शहरातील सोनबर्डी येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात चार वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या संबंधित अभियंता (इंजिनियर) आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या . नगरपालिकेत निवेदन देताना राष्ट्रवादीचे नेते दिलीप खोडपे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, नगरसेवक जावेद मुल्लाजी, गोपाळ राजपूत, सचिन बोरसे,…

Read More