Headlines

आपली संख्या तुटपुंजी, काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतील:प्रादेशिक पक्ष मजबूत करणे काँग्रेसचे कर्तव्य, संजय राऊतांचा मित्रपक्षाला सल्ला

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या ओढाताणीवर संजय राऊत यांनी आज सडेतोड भूमिका मांडली. “आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून लढत आहोत, मोदींचा पराभव करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, अशा वेळी राज्यांमधील छोट्या जागांवरून काँग्रेसने मित्रपक्षांशी संघर्ष करू नये,” असे सल्ला संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाला दिला आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या…

Read More

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान अन् कौशल्य आत्मसात करावी:प्रा. एकनाथ होले यांचे विद्यार्थ्यांना आवाहन, नेप्तीत मार्गदर्शन उपक्रमाला मिळाला प्रतिसाद‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर दहावीनंतर अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, आयटीआय, डिप्लोमा तसेच विविध कॉम्प्युटर कोर्सेस असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीनिवडी, क्षमता आणि भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन शाखा निवडावी. यशस्वी होण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. आजच्या काळात कौशल्याला जास्त महत्त्व असून, विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन प्राध्यापक एकनाथ होले…

Read More

जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता:हवामान विभागाचा अंदाज; तापमानात अत्यल्प घट‎

प्रतिनिधी | अकोला गत तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेचा भडका उडाला असतानाच बुधवारी मात्र तापमान तुलनेने कमी नोंदण्यात आले. पारा ४४.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला असून ३ मेपर्यंत मात्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच याच कालावधीत अवकाळी पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे….

Read More

‘जीएमसी’त आता खऱ्या अर्थाने‎‘स्मार्ट’स्वच्छता; दोन वेळा सफाई‎:कंपनीच्या विरोधात तक्रारी तीन शिफ्टमध्ये होतेय रुग्णालयाची मशीनद्वारे स्वच्छता‎

प्रतिनिधी | अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेसाठी नियुक्त स्मार्ट कंपनीमार्फत दिवसांतून तीन शिफ्टमध्ये स्वच्छतेचे काम केले जात असल्याने रुग्णालयाची स्वच्छता केली जात आहे. संपूर्ण रुग्णालयाची मशीनद्वारे स्वच्छता कंत्राटी कर्मचारी आता करत असल्याने रुग्णालयाचे आवार वॉर्डाच्या समोरील पॅसेज, सर्विस गल्लीत साचलेले कचऱ्याचे ढीगही उचलण्यात आले आहेत. रुग्णालयात वॉर्डामध्ये प्रवेश करताच येणारी दुर्गंधी आता दूर झाली आहे….

Read More

दिव्यांग, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार:प्रहार संघटना कायम राहणार, बच्चू कडू यांची घोषणा

आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी हाती घेणार आहोत. काल परवा ज्या चर्चा झाल्या, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घ्यावे, हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले, मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य…

Read More

कोपरगाव आगारासाठी नवीन बस देण्याची मागणी:आमदार आशुतोष काळे यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन‎

प्रतिनिधी | कोपरगाव कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे कोपरगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आ. काळे यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेवून कमी असलेल्या बसच्या…

Read More

विहिरीत साबडे कोसळले, मजूर ठार; दुसरा गंभीर जखमी:वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील घटना‎

प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा शिवारात विहिरीतील मलबा काढणारी साबडे अंगावर पडून एक मजूर ठार झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे रायगड हॉटेलच्या पाठीमागे गट नंबर १० मध्ये शरद भोपळे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. राजपूत ठेकेदारामार्फत काम चालू होते. विहीर…

Read More

धर्म व संस्कृतीचे पालन करणे गरजेचे;‎ संघटन, धार्मिक जागृतीची आवश्यकता‎:संमेलन डॉ. साध्वी धर्मासिहनी गायत्री यांचे नाचनवेल येथे हिंदू संमेलनात प्रतिपादन‎

प्रतिनिधी | नाचनवेल धर्माचे व भारतीय संस्कृतीचे पालन करणे गरजेचे आहे, हिंदू संस्कृती टिकवणे संघटन आणि धार्मिक जागृती गरजेची आहे, असे प्रतिपादन डॉ. साध्वी धर्मासिहनी गायत्री यांनी केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू संमेलने आणि विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे मंगळवार, २८ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर…

Read More

गोशाळेच्या आगीत चारा व गुरांचे साहित्य जळून खाक:गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली

प्रतिनिधी | सोयगाव आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचालित अंजनाई गोशाळेत मंगळवारी (दी.२८) दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे ३० क्विंटल चारा व गुरांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली. दुपारी तीनच्या सुमारास…

Read More

संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख दूर होऊन स्थैर्य मिळते- राधेश्याम महाराज:आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा‎

प्रतिनिधी | आनवा कलियुगात मनुष्याला शांती आणि समाधान मिळवायचे असेल, तर संतांचा आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख, ताणतणाव आणि अहंकार दूर होऊन मनाला स्थैर्य लाभते, असे राधेश्याम महाराज चातुर्मास्ये यांनी सांगितले. भोकरदन तालुक्यातील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात कीर्तनसेवा संपन्न झाली….

Read More