Headlines

विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी घाटनांद्रा परिसरात जि.प. शाळेच्या गुरुजींची धडपड:विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढीचा ध्यास; जिल्हापरिषदेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा सध्याच्या काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शाळेतील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी एक अनोखा पुढाकार हाती घेत ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक उन्हाची तिव्रता असतानाही गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत…

Read More

नातीच्या लग्नाच्या दिवशीच आजोबांचा‎मृत्यू, दुःख बाजूला ठेवून वधूची पाठवणी‎:सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील हृदयद्रावक घटना‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा आनंद आणि उत्साहाने भरलेल्या लग्नसोहळ्याला अचानक दु:खाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना घाटनांद्रा येथे मंगळवारी घडली. येथील माधवराव रामदास तायडे यांची कन्या गायत्री हिचा विवाह मंगळवारी (२८ एप्रिल) ठरलेल्या मुहूर्तावर सायंकाळी पार पडला. मात्र याच दिवशी तिचे आजोबा रामदास तायडे (७७ ) यांचे निधन झाल्याने संपूर्ण तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रामदास श्रीपत…

Read More

वाळूजमधील कारखान्याला आग; 50 कामगार बचावले:अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण

वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री वरद इंडस्ट्रीज या कारखान्याला २९ एप्रिलच्या रात्री भीषण आग लागली. सुदैवाने आगीच्या वेळी ड्यूटीवर असलेल्या ५० कामगारांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. गट क्रमांक १२६ मधील प्लॉट क्रमांक ८ वर असलेली ही…

Read More

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग १० वर्षे संचालक‎पदावर राहिलेल्या नेत्यांना आता निवडणूक‎लढवता येणार नसल्याने या दिग्गजांनी आपल्या‎कुटुंबातील वारसदारांना रिंगणात उतरवण्याची‎तयारी पूर्ण केली आहे.‎ ‎ बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने‎सलग २ कार्यकाळ (१० वर्षे) संचालक‎राहिलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी…

Read More

इंदोरा बायोमास बँकेला आग, 4 कोटींचे नुकसान:3 हजार टन तणस जळून खाक, इथेनॉल निर्मितीसाठी साठा

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील इंदोरा येथील बायोमास बँकेला २७ एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली. रामटेक-खात मुख्य मार्गावरील या घटनेत इथेनॉल निर्मितीसाठी साठवून ठेवलेले सुमारे ३ हजार टन तणस जळून खाक झाले. यामुळे कंपनीचे अंदाजे ३ ते ४ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बायोमास बँक शेतकऱ्यांकडून…

Read More

अमरावती विद्यापीठाचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर:प्राचार्य मांडवकर, गव्हाळे, धोटे, देशमुख यांच्यासह 12 जणांना सन्मान

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे यावर्षीचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र दिन आणि विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी हे पुरस्कार वितरित केले जातील. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात विशेष समारंभात हे वितरण होईल. या पुरस्कारांमध्ये इंदिरा महाविद्यालय, कळंबचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांचा…

Read More

थिलोरी येथे गोठ्याला आग:नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास विकी बावनेर यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. ही माहिती मिळताच गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी तात्काळ धाव घेतली. सुदैवाने, या आगीत गोधनाचे कोणतेही नुकसान झाले नाही. तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वेळेवर मदतीमुळे आग विझवण्यात यश आले….

Read More

दर्यापूरमध्ये वीज प्रश्नावरून नगरसेवकांचा महावितरणवर मोर्चा:अभियंत्यांच्या कार्यालयासमोर लावले 'बेशरम'चे झाड

दर्यापूर शहरात अनियमित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ‘बेशरम’चे झाड लावून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी नगरसेवकांनी थेट विद्युत वितरण कार्यालयावर…

Read More

राहुरी, बारामतीत महायुतीचा 'एकतर्फी' करिश्मा:अक्षय कर्डिले अन् सुनेत्रा पवारांच्या विजयाचा अंदाज, काय सांगतो एक्झिट पोल?

राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघांच्या रिक्त जागांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक पार पडली. राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या निवडणुकीत राहुरीमध्ये 56.20 % तर बारामतीमध्ये 58.17 % मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भाजपने राहुरीतून दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे…

Read More

माणमध्ये टंचाईच्या बैठकीत 'हाय व्होल्टेज' ड्रामा:CEO नागराजन यांनी सदस्याचा माइक हिसकावला! VIDEO

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील नेहमीच दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील भीषण अशा पाणीटंचाईच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने बैठकीचे वातावरण काही काळ टाकले दरम्यान अनिल देसाई बोलत असतानाच या क्षणी नागराज यांनी अक्षरशः अनिल देसाई यांच्या हातातून हिसकावून…

Read More