Headlines

पार्थ पवारांच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे?:VSR विमान प्रवासावर RTI कार्यकर्त्याचा सवाल; जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या व्हीएसआर कंपनीच्या विमान प्रवासावर जोरदार टीका केली आहे. 1800 कोटींची जमीन मोफत स्वतःच्या कंपनीच्या नावावर करून घेताना पार्थ पवारांना काहीही माहिती नसते. आणि त्यांच्या म्हणण्यावर सरकार व यंत्रणा विश्वास ठेवते. जनतेला मूर्थ समजणे बंद करा. तुमच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे? याचे…

Read More

ठेकेदाराचा निष्काळजीपणा जीवावर बेतला:क्रेन अंगावर कोसळून पोलिसाचा जागीच मृत्यू, मानखुर्दमध्ये मनपाच्या कामादरम्यान घडली घटना

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते कामात सुरक्षेचा खेळखंडोबा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान, एक अवाढव्य ड्रिलिंग क्रेन थेट मोटारसायकलवर कोसळली. या भीषण अपघातात नेहरू नगर पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष गोपाळ चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. ठेकेदाराने क्रेन उभी करताना दाखवलेला निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर…

Read More

लोहगावमध्ये भाड्याच्या बंगल्यात गांजाची लागवड:परप्रांतीय तरुणाला अटक, 41 झाडे लावल्याचे उघडकीस; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे पोलिसांनी लोहगाव येथील एका बंगल्यात गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ४१ गांजाची झाडे लावल्याचे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०, रा. नमो पॅरेडाईज, पठारे वस्ती, लोहगाव) आहे. पांचाल मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी असून, त्याने लोहगावमध्ये…

Read More

भाजप विरुद्ध शिवसेना महायुतीत नवा संघर्ष:भूमाफिया असल्याच्या आरोपांनंतर पलटवार; सरनाईक गटाकडून मेहतांना नोटीस

भाईंदर पाडा येथील भूखंड वादावरून सत्ताधारी महायुतीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सरनाईक यांच्या विहंग समूहाने मेहतांना कायदेशीर नोटीस बजावली असून, बदनामीकारक आणि खोटी विधाने तात्काळ थांबवावीत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण…

Read More

सिव्हिल आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज:एमबीबीएस प्रवेश ऑगस्टपासून; "एलओपी''नंतर जिल्ह्याला मिळणार १०० जागा‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हिल) चेहरा-मोहरा आता बदलला असून त्याचे अधिकृत नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय’ असे करण्यात आले आहे. नाव बदलल्याने शैक्षणिक क्रांतीचे पाऊल पडले असले तरी, प्रत्यक्षात एमबीबीएसच्या १०० विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचसाठी जिल्ह्याला आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एनएमसी’कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ऑगस्ट २०२६ पासून ही…

Read More

शिर्डीत राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य संमेलनात फुलला भक्तीचा मळा:प्रख्यात साहित्यिक राजेंद्र फंड यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले

प्रतिनिधी | अहिल्यानगर श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या पावन शिर्डी नगरीत २८ वे राष्ट्रसंत गाडगे महाराज मराठी साहित्य संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. प्रख्यात साहित्यिक राजेंद्र फंड यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. साहित्याच्या या महाकुंभात राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांनी शब्दांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण केली. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आचार्य डॉ. शंकर अंदाणी होते. तर प्रमुख पाहुण्या…

Read More

युवक मृत्यूप्रकरणी ‘एलसीबी’कडून चौकशी:पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेश दिले

प्रतिनिधी | अकोला जुने शहर शिवाजी नगर परिसरातील चेतन बबन शेळके (२८) यांचा भाजल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी डाबकी रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु याप्रकरणी वस्तुस्थितीशी विसंगत माहिती प्रसारित झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेकडे दिले होते. त्यानुसार मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी पथकासह…

Read More

वादळामुळे वीजपुरवठा खंडित; नागरिकांनी जागूनच काढली रात्र:महावितरण अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप – खांब जमीनदोस्त‎

प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा येथे सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. वेळीच दुरुस्ती झाली असती. तर कदाचित नागरिकांचा त्रास टळला असता. त्यामुळे महावितरणच्या ढिसाळ नियोजनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते. त्यामुळे…

Read More

गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रा; संरक्षण करण्याचीही मागणी:पालखीत ठेवून नेलेले निवेदन दिले तहसीलदार सुनील चव्हाण यांना‎

प्रतिनिधी | अकोट गोमातेला राष्ट्रमाता घोषित करून तिचे व गोवंशाचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी कठोर कायदे, करा अशी मागणी करत सोमवारी गोभक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी गावातून पदयात्रा काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री नरसिंग महाराज मंदिर येथून गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रेला प्रांरभ झाला. या पदयात्रेत पालखीत गोवंश प्रेमींच्या सह्यांचे निवेदन ठेवण्यात आले होते. तसेच…

Read More

एन्काउंटर स्पेशालिस्ट नेमून निवडणुका जिंकणे हा कसला पराक्रम?:संजय राऊतांचा मोदी-शाहांना सवाल, बच्चू कडूंच्या विलीनीकरणावरही शंका व्यक्त

देशातील निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज का भासते?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला ‘दहशतवाद’ असे…

Read More