Headlines

Heat wave in 8 states including Maharashtra; 1 death due to heatstroke in Gondia, Banda @ 47.60 hottest place in the country for 5th consecutive day


  • Marathi News
  • National
  • Heat Wave In 8 States Including Maharashtra; 1 Death Due To Heatstroke In Gondia, Banda @ 47.60 Hottest Place In The Country For 5th Consecutive Day

नवी दिल्ली3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

यूपीचे बांदा सलग पाचव्या दिवशी देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले. गुरुवारी बांदाचे तापमान ४७.६ अंश होते. १७ मे रोजी ४६.४ अंश, १८ ला ४७.६ अंश, १९ ला ४८.२ अंश व २० मे रोजी ४८ अंश होते. हवामान विभागाचा अंदाज आहे की पुढील एक आठवडा महाराष्ट्रासह ८ राज्यांत तीव्र उष्माघातापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. यूपी, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट आणि राजस्थानसह ११ राज्यांसाठी आठवड्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

रात्रीही पारा ३० च्या पुढे… परिणाम- हीट स्ट्रेस वाढल्याने हृदयविकाराचा धोका, उत्पादनावरही गंभीर संकट

शहरांमध्ये रात्रीही थंड का होत नाहीत? – डांबरापासून बनलेले काळे रस्ते आणि खुली पार्किंग स्थळे सूर्याची उष्णता वेगाने शोषून घेतात. – गडद रंगाची छते दिवसभर सौर ऊर्जा शोषून घेतात आणि ती आतच रोखून ठेवतात. – काँक्रिटच्या उंच-उंच इमारती गरम हवेचा प्रवाह रोखतात, ज्यामुळे रात्रीही उष्ण राहतात. – कारखाने, गाड्या, एसीमधून सतत निघणारी कृत्रिम उष्णता वातावरणाला आणखी तापवते. – काँक्रिट आणि सिमेंटमुळे पाणी जमिनीच्या आत जाऊ शकत नाही, ज्यामुळे पृष्ठभागाचा नैसर्गिक ओलावा नष्ट होतो. कोरडेपणा उष्णता वाढवतो. रात्री थंड न झाल्याने काय नुकसान होते? – रात्री गारवा न मिळाल्याने शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित होत नाही. वृद्ध व हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये हार्ट अटॅक/स्ट्रोकचा धोका जास्त असतो. – रात्रीच्या उष्णतेमुळे वनस्पती आपली ऊर्जा साठवण्याऐवजी ‘श्वसनात’ खर्च करतात. पिकांचे दाणे लहान राहतात. उत्पादन घटते. – पारा ३० अंशांच्या वर राहिल्याने गाढ झोप लागत नाही, ज्यामुळे थकवा आणि चिडचिडेपणा वाढतो. – कूलिंग उपकरणे २४ तास सुरू राहिल्याने विजेची मागणी सर्वोच्च स्तरावर राहते. ट्रान्सफॉर्मर थंड होऊ शकत नाहीत. ग्रीड फेल होण्याचा धोका वाढतो.

उष्माघाताचा आठ राज्यांना फटका

१. यूपी (मध्य आणि पश्चिम भाग) २. मध्य प्रदेश (पूर्व आणि मध्य भाग) ३. राजस्थान (पूर्व भाग) ४. ओडिशा (पश्चिम व अंतर्गत भाग) ५. झारखंड (पश्चिम भाग) ६. तेलंगण (जवळपास संपूर्ण राज्य) ७. आंध्र (उत्तर किनारपट्टी व अंतर्गत) ८. महाराष्ट्र (विदर्भ व पूर्व भाग)

दिव्य मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/चंदीगड | ज्येष्ठ महिन्याच्या या भीषण उकाड्यापासून सध्या दिलासा मिळण्याची शक्यता नाही, पण यावेळी सर्वात मोठा धोका हा आहे की दिवसाच्या उष्माघातानंतर रात्रीही उकाड्याचा विक्रम मोडत आहेत. दिल्लीत मे महिन्यात गेल्या १४ वर्षांतील सर्वात उष्ण रात्र नोंदवली गेली. गुरुवारी सफदरजंगमध्ये किमान तापमान ३१.९ अंश राहिले. दुसरीकडे, देशात भीषण उष्माघातामुळे सलग चौथ्या दिवशी विजेच्या कमाल मागणीने विक्रम मोडला. गुरुवारी दुपारी ३:४५ वाजता मागणी २७०.८२ गीगावॅटच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. मंत्रालयानुसार, थर्मल ऊर्जेतून ६२.८% आणि सौर ऊर्जेतून २२% मागणी पूर्ण झाली. हवामान विभागाच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पारा ४५ अंशांच्या पुढे राहण्याच्या अंदाजामुळे मागणी आणखी वाढेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *