Headlines

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎

आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…

Read More

अकरावी प्रवेशासाठी 3 फेऱ्या, मुलींसाठी जादा राऊंड:दहावीच्या निकालानंतर नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण, आता पसंतीक्रम

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. लवकरच दहावीचा निकाल लागण्याची शक्यता असल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील शाळा स्तरावरील ऑनलाइन नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण तीन नियमित फेऱ्या होणार असून, मुलींसाठी एक विशेष जादा फेरी निश्चित करण्यात आली आहे. दहावीचा निकाल लागताच…

Read More

ठाण्यात बस चालकाला लाकडी दांड्याने मारहाण:डोक्यात फटका बसल्याने बस चालक बेशुद्ध; पाहा घटनेचा भयंकर VIDEO

मिरा – भाईंदर महापालिकेच्या बस चालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत बस चालकाच्या डोक्यात फटका बसल्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हल्लेखोर बस चालकाला भयंकर पद्धतीने मारहाण करताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने धावत्या बसला कट मारल्याच्या किरकोळ कारणामुळे…

Read More

‘धुरंधर 2’ गाण्याच्या वादात अंतरिम स्थगितीस नकार:उच्च न्यायालयाचे सुपर कॅसेट्सला 4 आठवड्यांत 50 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी त्रिमूर्ती फिल्म्स आणि ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांमधील कॉपीराइट वादात त्रिमूर्ती फिल्म्सला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. हे प्रकरण ‘तिरछी टोपीवाले (ओए ओए)’ या गाण्याशी संबंधित आहे. त्रिमूर्ती फिल्म्सने ‘धुरंधर 2’ ची ओटीटी (OTT) रिलीज थांबवण्याची मागणी केली होती, जी कोर्टाने थांबवण्यास नकार दिला. मात्र, न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी सुपर कॅसेट्सला…

Read More

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 57.8% मतदान:मतदानादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने जामनगर महानगरपालिकेत आपच्या उमेदवारासह 3 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये रविवारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 57.08% मतदानाची नोंद झाली आहे. यापैकी 15 महानगरपालिकांमध्ये 49%, 84 नगर परिषदांमध्ये 58.12%, 34 जिल्हा परिषदांमध्ये 60.21% आणि 260 तालुका पंचायतींमध्ये 61% मतदानाची नोंद झाली. मतमोजणी 28 एप्रिल रोजी होणार आहे. अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोट यासह 15 महानगरपालिका, 84 नगरपालिका,…

Read More

खऱ्या गरजूंना मिळावा सेवा हमी कायद्याचा लाभ:किशोर बोरकर यांचे सेवा हक्क आयुक्तांना साकडे

अमरावती येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब निचळ आणि माजी महापौर अशोक डोंगरे यांनी सेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खऱ्या गरजूंना सेवा हमी कायद्याचा लाभ मिळावा, अशी मागणी नोंदवली. बोरकर यांच्या म्हणण्यानुसार, जनतेला निर्धारित वेळेत शासकीय आणि निमशासकीय सेवा, दाखले, प्रमाणपत्रे व आवश्यक…

Read More

युवक काँग्रेसकडून ‘पाच अभियानां’ची घोषणा:सामाजिक तणाव, जातीय प्रश्न, अंधश्रद्धेविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम

युवक काँग्रेसने राज्यात ‘पाच अभियानां’ची घोषणा केली आहे. सामाजिक तणाव, जातीय प्रश्न आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि अभिषेक अवचार यांनी ही माहिती दिली. ‘रोहित वेमुला, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश’ या विचारवंतांच्या नावाने ही पाच अभियानं राबवली…

Read More

कोकणातील शेतकऱ्यांना दिली बोगस खते, कीटकनाशके:कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मागणी

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे या निकृष्ट उत्पादनांमुळे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा…

Read More

मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा:8 महीने उलटूनही सातारा गॅझेटचा जीआर न निघाल्याने संताप, मुख्यमंत्र्यांवरही टीका

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढतो असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावर आठ महीने जाले तरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले गेले नाहीत, अशा शब्दात जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मनोज…

Read More

Delhi 6-Lane Dwarka Tunnel Approved; Vikram Misri Term Extended Till 2027

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांना मुदतवाढ 1 जुलै रोजी भारत सरकारने परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला आहे. आता विक्रम 14 जुलै 2027 पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काम करतील. विक्रम यांच्या कार्यकाळाला कॅबिनेटच्या…

Read More