Headlines

PM मोदी म्हणाले- पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा:भारतात मोठ्या तेलाच्या विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शेजारील युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. पंतप्रधानांनी हैदराबादमध्ये सांगितले की, भारतावर या जागतिक संकटाचा परिणाम जास्त आहे, आपल्याकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत. ते म्हणाले की, ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. कारपूलिंग…

Read More

वावटळीत पत्रे व दगड पडून महिलेचा मृत्यू‎:वैरागमधील संजय नगरात अचानक घडलेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी, उपचार सुरू‎

वैशाखाच्या तळपत्या उन्हात माणूस नकळत सावलीचा आसरा शोधत असतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून काही क्षण दिलासा मिळावा म्हणून भिंतीच्या कडेला विसावलेल्या तिघी महिलांना मात्र हा आसरा जीवघेणा ठरला. काही क्षणांतच आनंदाने सुरू असलेला दुपारचा निवांत क्षण आक्रोशात बदलला. अचानक आलेल्या वावटळीने घरावरील पत्रे उडाले तसेच कुंभाटी आणि दगड वीटा पडून एका महिलेचा मृत्यू झाला…

Read More

लढायची वेळ आली की कोणाला तरी पुढे करतात:विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे व काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. लढायची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. तसेच गोरगरीब, शोषित आणि दिव्यांगांच्या हितासाठी शिवसेना सदैव कार्यरत असल्याचे सांगत, त्यांनी बच्चू…

Read More

बेघरांना घरे न दिल्यास‎शाळा, जिल्हाधिकारी‎कार्यालयात राहणार‎:आ. साजिद खान पठाण यांचा इशारा‎

प्रतिनिधी |अकोला रेल्वे स्थानकाजवळील तार फैल परिसरात सोमवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर दुपारी काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण यांनी बेघर झालेल्या रहिवाशांना सोबत घेत पत्रकार परिषद घेतली. मान्सूनच्या उंबरठ्यावर कुटुंबे उघड्यावर असून, या कुटुबांच्या पुनर्वसनाविना कारवाई करण्यात आली. त्यामुळे तातडीने निवाऱ्याची व्यवस्था न केल्यास बेघर झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महापालिकेच्या शाळा…

Read More

सात महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी:SC म्हणाले- हा बाळाचा नाही, महिलेच्या इच्छेचा प्रश्न, तिला प्रसूतीसाठी भाग पाडू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या एका महत्त्वाच्या निर्णयात सात महिन्यांपेक्षा जास्त गर्भवती असलेल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला वैद्यकीय गर्भपाताची (अबॉर्शनची) परवानगी दिली. मुलीने स्पष्टपणे सांगितले होते की तिला गर्भधारणा सुरू ठेवायची नाही. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने म्हटले, ‘हा जन्म घेणाऱ्या बाळाचा प्रश्न नाही. महत्त्वाचे हे आहे की महिलेला काय हवे आहे….

Read More

भाजप नगरसेविका शालन शिंदेला न्यायालयाने जामीन पुन्हा नाकारला:शालन हिची बहीण शारदा शिंदे हिला चार महिन्यांनी जामीन झाला मंजूर

मनपा निवडणुकीच्या काळात मनसे विद्यार्थी शहर प्रमुख सरवदे याच्या खून प्रकरणात चार महिन्यांपासून अटकेत असलेल्या नगरसेवक शालन शिंदेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. मात्र तिची बहीण शारदा शिंदे हिचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शालन शिंदे यांचे वकील संतोष न्हावकर आता जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. रविवार पेठ, जोशी गल्लीत निवडणुकीच्या वादातून बाळासाहेब…

Read More

इम्तियाज यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल:कचरा हस्तांतरण केंद्रावरील काम रोखणे भोवले

एन-१२ भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर काम थांबवल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनपा मार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या वेस्टर्न इमर्जनरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी विशाल विलासराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या…

Read More

राज्यात एआय, 5-जीमध्ये 4,080 कोटींची गुंतवणूक:पुणे, रायगडमध्ये प्रकल्प, 4750 रोजगार मिळणार

महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि अत्याधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दोन सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून तब्बल ४,०८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ४,७५० तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. राज्य सरकारला…

Read More

कठडे तोडून लालपरी थेट शेतात पलटली:बसमध्ये आरडाओरड, प्रवाशांचा थरार; 7 महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण एसटी अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण दुर्घटनेत 7 महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 33 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा…

Read More

उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार:अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा डाव- युवकांचा आरोप‎

अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रक्रियेच्या विरोधात बुधवारी तरूणाई रस्त्यावर उतरली. या उपगवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत जनआक्रोश मोर्चा काढला. याच मुद्यावर धरणे आंदोलन ते आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी…

Read More