लाडकी बहीण योजनेला कात्री:80 लाख महिला बाद झाल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात
राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला मोठ्या प्रमाणावर कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांचा या योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ गेल्या एका महिन्यात तब्बल 80 लाख महिलांना या योजनेतून बाद…