Headlines

11वर्षापूर्वी सोलापुरात भूमिपूजन केलेले उड्डाणपूल का झाले नाहीत?- दिव्य मराठी:गडकरी- मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी जागाच दिली नाही; तर काय हवेत उड्डाणपूल

सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन हे दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. मात्र भूमिपूजन होऊन 11 वर्षे लोटली तरी काम सुरू झालेले नाही. मोहोळ ते वळसंग हा 740 कोटींचा नवीन महामार्ग बांधण्यात येत आहे. त्यासाठी खासदार प्रणिती शिदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात श्रेयाची लढाई…

Read More

विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू कराव्यात:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ….

Read More

दिनवाडा परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा:सोलार पॅनल उडून शेतकऱ्यांचे नुकसान.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी‎

परिसरात सोमवारी (२५ मे) झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांसह विविध मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे सर्कलमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासूर स्टेशन गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांनी सांगितले आहे. दिनवाडा येथील शेतकरी तथा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य…

Read More

मोठा निर्णय:पंढरपूर कॉरिडॉरला हिरवा कंदील, 4000 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; भूसंपादनाची प्रक्रिया 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार

मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार समाधान आवताडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूर प्रकल्पासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून भूसंपादनाची…

Read More

सावरकर जयंतीनिमित्त पुण्यात अभिवादन कार्यक्रम:‘भारतरत्न’ सन्मानासाठी केंद्र-राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे आणि सीए सर्वेश मेहेंदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे, सचिव…

Read More

पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाले चांगली गोष्टय:अजितदादांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली; सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज त्यांचा अर्ज भरण्यात आला आहे. त्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादा असताना झाल्याचेही म्हटले आहे. तसेच अजितदादांच्या विमान अपघातावरही भाष्य केले…

Read More

Indias Operation Amistad for Venezuela Earthquake Victims; June 27 Current Affairs

Marathi News National Indias Operation Amistad For Venezuela Earthquake Victims; June 27 Current Affairs 3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. ज्येष्ठ IPS अधिकारी महेश दीक्षित इंटेलिजेंस ब्युरोचे संचालक असतील 25 जून रोजी केंद्र सरकारने आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांची इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक…

Read More

अमरावतीचा पारा 43 अंशांवर, सात वर्षांतील उच्चांक:अवकाळीनंतर अचानक वाढला उन्हाचा तडाखा, नागरिक हैराण

गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सोमवारी (१३ एप्रिल) ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक आहे.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, या आठवड्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जलविज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी…

Read More

दिल्लीत मुलीवर बलात्कार – हत्या, आरोपीला गोळी मारली:पोलिसांचा दावा- पळून जाण्याचा प्रयत्न करत होता; रुग्णालयात दाखल

दिल्लीत एका 11 वर्षीय मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मंगळवारी रात्री पोलीस चकमकीत जखमी झाला. पोलिसांचा दावा आहे की, त्याला गुन्हेगारी घटनास्थळाची (क्राइम सीन) पुनर्रचना करण्यासाठी (रीक्रिएट) नेले जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्यासाठी त्याच्या पायात गोळी मारण्यात आली. सध्या तो रुग्णालयात दाखल आहे. पीडित मुलगी फुगे विकायची. ती सोमवारी सकाळी…

Read More

राऊतांचा एक पाय काँग्रेसमध्ये, दुसराही लवकरच जाणार!:त्यांची निष्ठा ठाकरेंकडे नाही तर सोनिया गांधी अन् 'सिल्व्हर ओक'च्या दारात- नवनाथ बन

देवाभाऊंनी कोणत्याही पक्षाची डेड बॉडी केलेली नाही, तो अधिकार जनतेला असतो. उबाठा गटाची डेड बॉडी करण्याचे काम जनतेने केले आहे. जनतेने तुम्हाला विधानसभेला 20 तर एकही मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तुमच्याकडे दिली नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करूच नका, जनतेने तुमच्या कानाखाली मारली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन…

Read More