Headlines

पुणे महापालिकेत निधी वाटपात भेदभाव:सुनेत्रा पवारांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; 'सबका साथ, सबका विकास'ची करून दिली आठवण

पुणे महानगरपालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी वाटपावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक निधी मिळाल्याचे समोर आल्यानंतर, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ची आठवण करून देत, “शहराचा…

Read More

सुरक्षा:आसाम-मणिपूर सीमा; 1 हजार ट्रक अडकले, आंदोलनाचा इशारा

आसाम-मणिपूर सीमेवर इंधन, एलपीजी आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे १ हजारांहून अधिक ट्रक सध्या सुमारे १५ किलोमीटर लांब रांगेत अडकले आहेत. हे ट्रक आसाममधील हमारखाव्लिएन (फुलेर्तल) ते मणिपूरमधील लेंगांगपोकपी (जिरीबाम) या मार्गावर विविध ठिकाणी थांबले आहेत. इम्फाळपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी चालक सुरक्षा ताफ्याची प्रतीक्षा करत आहेत. ट्रक अडकण्यामागील प्रमुख कारण म्हणजे एनएच-३७ (इम्फाळ-जिरीबाम) मार्गावरील अनेक ठिकाणी…

Read More

सिल्लोडला वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या:वरिष्ठांनी अपमानित केल्याची फिर्याद, आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हा नोंद‎

आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी मृताचे भाऊ पोपट विठ्ठल भिवसने यांनी फिर्याद दिली. त्यात…

Read More

गुजरातमधील 2002 च्या पॅटर्ननुसार देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र:हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप

भारतीय जनता पक्ष २०२९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभर धार्मिक तेढ निर्माण करत असून, २००२ च्या गुजरात दंगलींप्रमाणेच हिंसाचार घडवण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केला. पाच राज्यातील निवडणुकीनंतर काही राज्यांत सुरू झालेला हिंसाचार हा याच मोठ्या कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार…

Read More

उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे या मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो…

Read More

केतन अग्रवाल हत्याकांड:सिया-चेतनच्या गुपचूप लग्नाबाबत केलेल्या चॅटिंगचा तपास; डेटातून गुपिते उलगडणार, चार महिन्यांपूर्वी विवाह केल्याची माहिती, पोलिस खातरजमा करतायत

पोलिसांनी सियाकडून दोन आणि चेतनकडून एक मोबाइल जप्त केला आहे. या मोबाइलमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर डेटा मिळाला असून त्यात त्यांच्या गुप्त लग्नाचे चॅटिंगही सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, त्यांच्या लग्नाचे अद्याप कोणतेही कायदेशीर पुरावे मिळाले नसले तरी या चॅटिंगची सखोल खातरजमा केली जात आहे. या जप्त केलेल्या मोबाइलच्या डेटा विश्लेषणाला थोडा वेळ लागेल. मोबाइल…

Read More

वाढीव हद्दीतून ‘7/12’ हद्दपार होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार:ग्रामीण ओळख पुसली जाणार, राज्य शासनाचा मोठा निर्णय, संभाजीनगरसह सर्वच महापालिकांना फायदा

राज्यातील शहरांचा विस्तार वेगाने होत असताना महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची ‘ग्रामीण’ ओळख आता कागदोपत्रीही पुसली जाणार आहे. या वाढीव क्षेत्रांमधील जमिनींचे ७/१२ उतारे आता कायमचे इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी अधिकृत ‘प . मात्र, या नवीन हद्दींचे नगर भूमापन (सिटी सर्व्हे) रखडल्याने आजही तेथील जमिनींचा व्यवहार किंवा नोंदणी ७/१२ उताऱ्यांवरच होत होती. सिटी…

Read More

पु. ल. स्मृती महोत्सवाला पुण्यात सुरुवात:पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, पुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा

पुण्यात ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु. ल. परिवार’ यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय पु. ल. स्मृती महोत्सवाला बुधवार, २४ मे रोजी सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्‌घाटन तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पंडित तळवलकर यांनी पु. ल. देशपांडे यांना ‘अतिशय आनंददायी ऊर्जा’ असे संबोधले आणि कला क्षेत्रातील त्यांचे योगदान युवा पिढीला समजणे महत्त्वाचे…

Read More

अकोल्याच्या दुर्गम भागात मुक्कामी एसटी पुन्हा धावली:15 जुनपासून राजूर ते रतनवाडी, सांम्रद, घाटघर ते शेंडी व परत राजूर ही बस धावणार‎

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, पर्यटकांची पंढरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अकोले आदिवासी तालुक्यातील दुर्गम रतनवाडी आणि साम्रद गावांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. तांत्रिक कारणांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुक्कामी एसटी बस सेवा १८ मेपा . माजी मंत्री तथा आदिवासी मधुकरराव पिचड यांनी या भागातील पर्यटन आणि जनसेवेसाठी ही मुक्कामी बस सेवा सुरू केली होती. मात्र,…

Read More

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात माकपचे आंदोलन:बडनेऱ्यात निदर्शने, अमरावतीत अधीक्षकांना निवेदन

स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) आणि त्यांच्या विविध जनसंघटनांनी सोमवारी तीव्र आंदोलन केले. बडनेरा येथे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तर अमरावतीत महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना निवेदन सादर करण्यात आले. वीज ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठवून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कृतीचा माकप कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. दुपारी २ ते ४ या वेळेत विद्युत…

Read More