विभागात तीन महिन्यांत 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:संभाजीनगर जिल्ह्यात 53 घटना, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम
दुष्काळी प्रदेश अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या ३ महिन्यांत तब्बल २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली असून, यात सर्वाधिक ५३ शेतकरी आत्महत्या एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्या आहेत. गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी, नद्यांनी खरडून नेलेली सुपीक जमीन, पिकांवरील कीड आणि…