जायकवाडी धरणातून आज सायंकाळी 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग:गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणातून (नाथसागर जलाशय) आज, मंगळवार (4 ऑगस्ट) सायंकाळी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरण नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान धरणाच्या सांडव्याद्वारे 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या…