Headlines

नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा; संजय शिरसाट यांची मागणी

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनी टीसीएसमध्ये (TCS) समोर आलेल्या धर्मांतरण प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय देण्यात आला होता, असा आरोप केला जात आहे. या संपूर्ण कटामागे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी…

Read More

केंद्रीय मंत्री मोहोळ यांची राजनाथ सिंहांशी भेट:पुणे विमानतळ विस्तार, कॅन्टोन्मेंट विलीनीकरण, इंदिरानगर जागेवर महत्त्वपूर्ण चर्चा

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुण्याशी संबंधित संरक्षण खात्याकडील अनेक प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पुणे विमानतळ विस्तार, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महानगरपालिकेत विलीनीकरण आणि इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना बजावलेल्या नोटीसा या प्रमुख मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन, विषय मार्गी लावण्यासंदर्भात…

Read More

अशोकराव खाल्लेल्या मीठाला जागायला शिका:पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, महाराष्ट्र काँग्रेसचा अशोक चव्हाणांवर हल्ला

महाराष्ट्र काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खाल्लेल्या मीठाला जागायला शिकले पाहिजे. पाठीचा कणा थोडा तरी मजबूत राखला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती लोकसभेत नामंजूर फेटाळल्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली…

Read More

भंडारा कृषी उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू:गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे प्रशासनात खळबळ

भंडारा येथील कृषी उपविभागीय अधिकारी कथित गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनागोंदीच्या आरोपांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कृषी विभागातील विविध योजना, अनुदान वाटप आणि परवान्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत एका वरिष्ठ समितीने प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. शेतकऱ्यांशी थेट संबंधित असलेल्या कृषी उपविभागीय अधिकारी…

Read More

अशोक खरातचे जेवण झाले कमी:तासनतास एकांतवासात राहतो बसून, पत्नी कुठे विचारले तर म्हणाला- 'ते देवालाच माहीत'

स्वतःला ‘दैवी अवतार’ म्हणवून घेत शेकडो भाविकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात आता पोलिस कोठडीत पुरता हबकला आहे. सुरुवातीला तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच ‘तुमच्यावर देवाचा कोप होईल’ अशा धमक्या देणारा आणि त्यांचे भविष्य सांगण्याचा अचरट प्रयत्न करणारा खरात आता कमालीचा नरम झाला आहे. पोलिस कोठडीचा फास जसजसा आवळला जात आहे, तसतसा त्याचा तोरा उतरला असून, आपल्या…

Read More

कर्जमाफीत एकही शेतकरी वंचित राहणार नाही:राम मंदिरातील चोरांना योगी सरकार सोडणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा विश्वास

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत करत, “एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला. तर राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणात “चोरी करणाऱ्यांना योगी आदित्यनाथ सरकार कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी चंद्रपूरमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मात्र बोलण्यास त्यांनी…

Read More

अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषद संपन्न:मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्ड अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार

अमरावती येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. मंदिरांवरील आघात रोखणे, मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजापेठ येथील श्री रामदेवजी बाबा मंदिर सभागृहात ही परिषद पार पडली. या परिषदेला विदर्भातील १५० हून अधिक प्रमुख…

Read More

मोदींनी ममतांना पराभवाची झालमुडी चाखवली:बंगाली जनतेने खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित केली; शिंदेंनी केले मोदी – शहांचे कौतुक

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पश्चिम बंगालमधील विजयाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. आज भाजपसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण, आज पहिल्यांदाच बंगालमध्ये कमळ उमलले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपने ममता बॅनर्जी यांना पराभवाची झालमुडी खाऊ घातली, असे ते म्हणालेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा…

Read More

राम मंदिर देणगी चोरी- टिन्नू यादवसह 8 आरोपींना अटक:आज कोर्टात हजर करणार; अरविंद केजरीवाल घेणार रामललाचे दर्शन

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात, मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह 8 आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करतील. तिथे त्यांच्या 14 दिवसांच्या रिमांडची मागणी केली जाईल. वास्तविक पाहता, गुरुवारी संध्याकाळी देणगी चोरी प्रकरणात पहिली एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली. श्रीराम जन्मभूमी…

Read More

रोहित पवारांचं उपोषण म्हणजे 'जरांगे स्टाईल नौटंकी:भाजप आमदार परिणय फुकेंची टीका, म्हणाले- 'अन्नत्याग'ऐवजी 'मीडिया त्याग' करावा

शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षनेत्यांचा वाढता पाठिंबा मिळत असला तरी, सत्ताधारी नेत्यांकडून मात्र यावर जोरदार टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ…

Read More