कुंपणच शेत खातंय!:जनतेच्या घामाचा पैसा लुटतायत; कुंभमेळ्याच्या कथित गैरव्यवहारावरून नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील वाळूघाट, कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदारयादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुंपणच शेत खातंय’ अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नागपुरात पत्रकार परिषदेत पटोले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. भंडाऱ्यातील वाळूघाटांच्या…