Headlines

बंगळुरू डे-केअर प्रकरण, पालक म्हणाले- मुलांमध्ये भीती पसरली:वॉशरूमला जायला घाबरतात, केअरटेकरचा आवाज ऐकून थरथर कापायचे

बंगळुरू येथील डे-केअर सेंटरमध्ये मुलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या मुलीसोबत क्रूरता करण्यात आली होती, तिच्या पालकांची पोलिसांनी चौकशी केली. आईने सांगितले की, त्यांच्या मुलीच्या मनात भीती बसली होती. ती बाथरूममध्ये जाण्यास नकार देत असे, रडू लागे आणि तिथून पळून जात असे. मुलीमध्ये हा बदल डे-केअर सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर दोन महिन्यांनीच…

Read More

मुग-उडदाच्या पेरण्या 50 टक्क्यांवर; मका-सोयाबीनचा दबदबा:जिल्ह्यात 6.87 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या, मक्याची सर्वाधिक 158, सोयाबीन 110% पेरणी‎

. गेल्या आठ दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १ जून ते ४ ऑगस्ट कालावधीत ९५.४० टक्के (ऊसासह) क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी मूग आणि उडदाच्या पेरण्या ५० टक्क्यांवरच ठप्प झाल्या आहेत. दुसरीकडे मका आणि सोयाबीन या पिकांनी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत शंभर टक्क्यांहून अधिक पेरणी नोंदवत आपला दबदबा कायम…

Read More

आमदार धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत:परळीतील 'मराठा भवन'च्या जागेवरून नवा वाद, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरील राजकीय आणि कायदेशीर अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. परळीत ‘मराठा भवन’साठी दिलेल्या जागेवरून आता एक मोठा वाद उफाळून आला असून, धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत धनंजय मुंडे…

Read More

गुंडापाटीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत आंध्रप्रदेशातील भाविक ठार:हट्टा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल

औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर गुंडा पाटीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने आंध्रप्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 22 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी वाहन चालकाचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशातील काही भाविक एका टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे बारा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेसाठी गेले होते. उज्जैन,…

Read More

निफाडमध्ये 1,527 ‎पुस्तक संचांचा तुटवडा‎:अडीच महिने उलटूनही पूर्ण संच उपलब्ध नाहीत‎

निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचा अद्याप पूर्ण पुरवठा झालेला नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ उलटला असून, तालुक्यात तब्बल १,५२७ पुस्तक संचांचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना तातडीने पुस्तके उपलब्ध न झाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रश्नाबाबत…

Read More

विवाह मोडल्याने तरुणीचा खून:आरोपीला जन्मठेप, पुणे सत्र न्यायालयाचा निकाल; २० हजार रुपये दंडही ठोठावला

विवाह मोडल्याच्या कारणावरून एका तरुणीवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी हा निकाल दिला. शरीफ रज्जाक शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये शेख याचा नाझनीन सादिक शेख (वय १८, रा. गणेश…

Read More

महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीच्या वावड्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्या:केंद्रात शिक्षणमंत्रिपदी वर्णी, विराेधकांचा दावा

केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पडदा टाकला. “मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईतच आणि महाराष्ट्रातच राहणार आहे”, असे स्पष्ट करत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या अफवा फेटाळून लावल्या. सीजेपी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान पायउतार झाल्यानंतर त्या पदावर फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा त्यांच्या दिल्लीवारीने…

Read More

अजय बंगा म्हणाले- गरिबी मिटवायची असेल तर नोकऱ्या द्याव्या लागतील:निखिल कामथ यांच्यासोबत वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांची चर्चा, तरुणांसाठी DQ ला यशाचा मंत्र सांगितले

वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा म्हणाले की, विकसनशील देशांमधील गरिबी दूर करायची असेल तर नोकऱ्या द्याव्या लागतील. त्यांनी पीपल बाय डब्ल्यूटीएफवर ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सीईओ निखिल कामथ यांच्याशी संवाद साधताना जागतिक अर्थव्यवस्था, भारताची प्रगती आणि तरुणाईच्या भवितव्यावर सविस्तर चर्चा केली. या संवादाचे संपादित अंश वाचा… प्रश्न: गरिबी संपवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? उत्तर: फक्त…

Read More

10 राज्यांमध्ये पावसाचा इशारा:राजस्थानमध्ये नवतपादरम्यान गारपीट; ओडिशात वादळामुळे 3 जणांचा मृत्यू, 250 घरांचे नुकसान

उत्तर प्रदेश, बिहारसह 10 हून अधिक राज्यांमध्ये शुक्रवारी पावसाचा इशारा आहे. मध्य प्रदेशात ग्वाल्हेरसह 6 जिल्ह्यांमध्ये दिवसा उष्णतेची लाट राहील, तर संध्याकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये आज 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. येथे वादळाचाही इशारा आहे. गुरुवारी श्रीगंगानगरमध्ये नौतपादरम्यान संध्याकाळी गारपीट झाली, पण येथील दिवसाचे कमाल तापमान 47.1°C राहिले. उत्तर प्रदेशात उष्णतेऐवजी पाऊस-वादळाची…

Read More

नांदगाव तालुक्याला विशेष पॅकेज द्या: शेतकऱ्यांची मागणी:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ‘विशेष पॅकेज’ची मागणी केली आहे. शिवसेना (उबाठा) समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पारंपरिक एनडीआरएफ निकषांनुसार मदत न देता, विशेष पॅकेज देण्याची त्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात ३० व ३१ जुलै रोजी नांदगाव तालुक्यात सलग ३५ तास मुसळधार पाऊस…

Read More