Headlines

डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नाहीच!:उंदीर मारण्याच्या औषधामुळे; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक खुलासा

मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूचा छडा 11 दिवसांनंतर लागला असून, याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने नाही, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फॉरेन्सिक अहवालात मृत व्यक्तींच्या शरीरात आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडाच्या नमुन्यांमध्येही ‘झिंक फॉस्फाईड’ या घातक रसायनाचे अंश आढळल्याने वैद्यकीय आणि पोलीस…

Read More

नीट पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी:जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची मागणी; तहसीलदारांना निवेदन‎

नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज, दि. १८ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले की, देशात शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रकारे खेळ केला जात आहे. नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणामुळे सुमारे २२…

Read More

सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51, त्र्यंबकमध्ये कुशावर्तावर उभारणार 31 फुटी नवी रचना

२०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या ध्वजस्तंभांचे पारंपरिक रूप या वेळी बदलेल. नाशिकच्या रामकुंडावर ५१ तर आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फुटी व नवीन घाटावर ५१ फुटी ‘अमृतमंथन’ ध्वजस्तंभ साकारण्यात येतील. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ कोटी ९ लाख रुपयांचा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. पारंपरिक ध्वजस्तंभ या संकल्पनेला आध्यात्मिक संदर्भ देण्यात…

Read More

राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पाऊस, गारपीट:विजांचाही इशाराच राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातर्फे सर्वसामान्य नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सध्या राज्यात पश्चिम विक्षोभाची (वादळ) स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. परिणामी, राज्यात उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने आज मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात मेघगर्जनेसह ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Read More

पारा 43.7 अंशांवर; उद्यापासून उष्णतेच्या लाटा:आगामी तीन दिवसात अकोल्याचे तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता

तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी करत शुक्रवार ते रविवार दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी पाच दिवसात तापमानात २ ते ४ अंशांदरम्यान वाढ होणार आहे. ४८ तासांत पारा २ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे २९…

Read More

ओडिशात बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचली व्यक्ती:बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले होते की- ज्याचे खाते आहे त्याला घेऊन या

ओडिशाच्या केओंझरमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना समोर आली. आदिवासी जीतू मुंडा आपल्या मृत बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचला. सांगाडा पाहून बँकेत एकच गोंधळ उडाला. खरं तर, जीतूला आपली बहीण कलारा मुंडाच्या खात्यातून 20 हजार रुपये काढायचे होते, यासाठी तो अनेकदा बँकेतही गेला. पण कर्मचाऱ्यांनी खातेदाराला घेऊन येण्यास सांगितले. जीतूने बँकेत आधीच कलाराच्या मृत्यूची माहिती दिली…

Read More

श्री अगस्ति ऋषी आश्रमात उद्यापासून महिनाभर अधिकमास कीर्तन महोत्सव:ग्रंथपारायण, अन्नदान‎आणि दिग्गज‎कीर्तनकारांची मांदियाळी‎

अकोले तालुक्याचे आराध्यदैवत श्री अगस्ति ऋषी आश्रमात वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार रविवारपासून (१७ मे) पुरुषोत्तम (अधिक) मासानिमित्त अखंड महिनाभर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.के.डी.धुमाळ यांनी . महोत्सवाचा शुभारंभ रविवारी सकाळी ८:३० वाजता आमदार डॉ. किरण लहामटे, हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ज्येष्ठ विश्वस्त बद्रिनाथशेठ मुंदडा व अध्यक्ष धुमाळ यांच्या…

Read More

रामकृष्ण आढेंनी सर्वोदय चळवळीला आपले सर्वस्व समर्पित केले- दाणे:मंजीतसिंह शीख यांना स्व. रामकृष्ण आढे स्मृती विदर्भभूषण पुरस्कार प्रदान‎

ज्येष्ठ सर्वोदयी रामकृष्ण आढे यांनी महात्मा गांधी, विनोबाजी, जयप्रकाश नारायण यांच्या सहवासात राहून भूदान, ग्रामदान, सर्वोदय चळवळीला सर्वस्व समर्पित केले. मोहमायातून मुक्ती घेऊन त्यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश दाणे यांनी केले. मारूती संस्थान केळीवेळी येथे “स्व.रामकृष्ण आढे स्मृती विदर्भभूषण पुरस्कार’ मनजितसिंह शीख यांना प्रदान करण्यात…

Read More

पाळत ठेवून अधिकाऱ्याच्या घरी चोरीचा दुसरा प्रयत्न

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे वर्ध्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या घरी पुन्हा एकदा पाळत ठेवून चोरीचा प्रयत्न झाला. परंतू, दार न उघडल्याने, चोरट्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी घरफोडी करून तब्बल सात तोळे सोन्याचे दागीने लंपास करण्यात आले होते. या चोरीचाही अद्याप तपास लागला नाही. वांबोरीत पुन्हा एकदा पाळत ठेऊन चोरीचा प्रकार उघडकीस…

Read More

शहा म्हणाले- TMC ने लोकांची फसवणूक केली:तामिळनाडूमध्ये 234 जागा, बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस

तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचार थांबेल. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होईल. निकाल 4 मे रोजी लागतील. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी दार्जिलिंगमध्ये एक रॅली घेतली. ते म्हणाले, ‘काँग्रेस, टीएमसीने दार्जिलिंगमधील लोकांसोबत आणि माझ्या गोरखा बांधवांसोबत फसवणूक आणि अन्याय केला…

Read More