Headlines

उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे

आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही….

Read More

इंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर:गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख, यंदा 70 हजार पर्यटकांची हजेरी‎

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा फटका जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पर्यटनाला बसला आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात इंधनाअभावी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी वेरूळकडे पाठ फिरवली आहे. दररोज सहा हजारांवर भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या आता पाचशेवर पोहोचली आहे. नेहमी गजबजलेला लेणी परिसर सध्या पूर्णपणे ओस पडला असून, व्यावसायिक…

Read More

साईनगरीचे आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाची नालेसफाई:गटारसफाई अन् फॉगिंग मोहीम, शिर्डीला अव्वल ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी- आरोग्य सभापती गोंदकर‎

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी शहरात पावसाळा सुरू होताच स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते, नाले आणि गटारी तुंबून नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच डासजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी शिर्डी नगर परिषदेने आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरभर नालेसफाई, गटारसफाई आणि औषध फवारणीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छ…

Read More

राज्यात भूमी अभिलेखची 50 नवी कार्यालये हाेणार:संभाजीनगरसह चार जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालये

राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाचा ‘मेगा’ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार राज्यात तब्बल ५० नवीन कार्यालयांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला १०,६८३ पदांचा आकृतिबंध आता प्रत्यक्ष अस्तित्वात आला आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला झुकते माप वाढते शहरीकरण आणि…

Read More

सोनोग्राफीच्या वादातून जळगावात हत्या:गर्भपाताला नकार दिला म्हणून अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; मुलाचा बुडून मृत्यू, आई जखमी, अंध पती आणि सासूचे कृत्य

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ गर्भपाताला नकार दिला म्हणून एका अंध महिलेला आणि तिच्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलाला विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्रूर कृत्यात चिमुकल्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याची गंभीर जखमी…

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकली ठार:विर्शी येथील घटना, साकोली तालुक्यात मानव – वन्यजीव संघर्ष शिगेला

साकोली तालुक्यात मानव- वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. याआधी एका नरभक्षक वाघिणीने दोघांचा जीव घेतला. तर अन्य एका हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. या घटनांची शाई वाळत नाही तोच बुधवार १५ एप्रिल रोजी पहाटे ५ च्या सुमारास विर्शी परिसरात मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका पाच वर्षीय चिमुकलीच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना घडली. आशिका…

Read More

विदर्भात पावसाची 75 टक्के तूट:जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या तुलनेत भीषण ओढ, चिंता वाढली

विदर्भात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या संकटात आल्या आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या १ ते १८ जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ७५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः ७९.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ १९.७ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भातील सर्व ११…

Read More

सीमाप्रश्नी बैठकीनंतर पवारांची शिंदेंसाेबत बंद दाराआड चर्चा:30 वर्षांनंतर विधानभवनात अशा बैठकीस पवार हजर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात ३० वर्षांनंतर विधानभवनातील अशा बैठकीस शरद पवार उपस्थित राहिले. बैठकीनंतर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले. त्यामुळे कॅबिनेट बैठक सोडून शिंदे स्वत:च्या दालनात पोहोचले. तेथे पवारांनी आधी त्यांच्याशी बंद दाराआड २० मिनिटे चर्चा केली. नंतर पवारांनी स्वत:च्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. पवारांचे एकनाथ…

Read More

जिद्द असेल तरच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते:प्रा. सागर भस्मे, दर्यापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा‎

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वच विषयाचे प्राथमिक ज्ञान घेणे महत्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान आत्मसात न करता त्यासोबतच विविध प्रकारची अद्यावत माहिती संकलित करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, ते क्षेत्र आपण निवडले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत,…

Read More

गौडगावात आज शनैश्वर जन्मोत्सव सोहळा:दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, अक्कलकोटच्या जागृत मारुती मंदिरात तयारी, महाप्रसाद, यज्ञाचे आयोजन‎

अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात शनिवार, १६ मे रोजी शनैश्वर जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर जुळून आलेल्या या विशेष ‘त्रिवेणी योगा’मुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वाता . या दुर्मिळ योगाचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीने पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री मारुतीराया आणि…

Read More