अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार!:प्राचार्यांनी तिसरीच्या विद्यार्थ्याचा गळा दाबून हवेत उचलले, नंतर हाताचा चावाही घेतला
शाळा हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे आणि सुरक्षिततेचे हक्काचे ठिकाण मानले जाते, जिथे शिक्षकांकडून त्यांना हक्काचे प्रेम आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कायदे लागू केले असले तरी, काही असंवेदनशील शिक्षकांच्या वर्तणुकीत अद्यापही बदल झालेला नाही. याच वास्तवाचा प्रत्यय अहिल्यानगरमध्ये नुकत्याच समोर आलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेवरून आला…