"श्रीं''ची पालखी 2 दिवस शहरात मुक्कामी:सकाळी खंडेलवाल विद्यालयात पाेहाेचणार संत गजानन महाराजांचा पालखी साेहळा
“श्री गजानन-जय गजानन’, “गण गण गणात बोते’चा जयघोष करत पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी संध्याकाळी भौरद येथे पोहोचला. भौरद येथे मुक्कामी असलेली श्रींची पालखी बुधवारी सकाळी ११ वाजता डाबकी रोडवरील खंडेलवाल महाविद्यालयात पोहोचणार आहे. यानंतर दोन दिवस राजराजेश्वर नगरीत फक्त “माऊली’चा गजर कानी पडणार आहे….