Headlines

क्वालालंपूर एअरवेजचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी:नेदरलँडहून हैदराबादला येत होते, विमानतळ हाय अलर्टवर; 4 दिवसांतील तिसरी घटना

हैदराबाद विमानतळावर नेदरलँड्समधून येणाऱ्या क्वालालंपूर एअरवेजच्या एका विमानाला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण हैदराबाद विमानतळ हाय अलर्टवर आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की विमानात बॉम्ब आहे, जो कधीही फुटू शकतो. तथापि, विमान सुरक्षितपणे हैदराबादला पोहोचले. यापूर्वी, शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता हैदराबाद विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा एक ईमेल मिळाला होता. त्यानंतर संपूर्ण विमानतळाची…

Read More

आयसीटी योजनेतून जि.प. शाळेमध्ये संगणक लॅब:वाशिंबे शाळेत 23 लाखांच्या प्रकल्पातून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारेझाली खुली‎

वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत २३ लाख रुपयांची सुसज्ज आयसीटी लॅब उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक क्रांती ठरत आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर आणि विविध मल्टिमीडिया साधनांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. परिणामी, पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक…

Read More

विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज:आषाढी यात्रेसाठी धावणार 5,500 विशेष गाड्या; गावांतून थेट पंढरपूरसाठी बस मिळण्याची सोय

“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी…

Read More

मोठा करार:भारत-अमेरिका पृथ्वीतून काढणार दुर्मिळ खनिजे, ‘क्वाड’ बैठकीत आराखडा सादर

पृथ्वीच्या पोटात दडलेल्या “रेअर अर्थ मिनरल्स’वर (दुर्मिळ खनिजे) एकाधिकारशाही गाजवणाऱ्या चीनला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी “क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीव्यतिरिक्त भारत आणि अमेरिकेने एका मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे अमेरिकी समकक्ष मार्को रुबियो यांनी सांगितले की, हे योग्य वेळी उचललेले अत्यंत आवश्यक पाऊल आहे. जयशंकर यांच्या मते, या फ्रेमवर्कमध्ये दुर्मिळ खनिजांचे…

Read More

आनंदोत्सव, घरांवर विद्युत रोषणाई, निळे झेंडे, लेक-जावयांचे आगमन:पुरणपोळीचा बेत, नवीन कपडे, लाडू, चकली, करंजी फराळाची तयारी, घराची रंगरंगोटी, आकाश कंदीलचा झगमगाट‎

प्रतिनिधी | सोलापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता. १४ ) साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यास सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी येतात. न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंद नगर, फॉरेस्ट, कुमठा नाका, हब्बूवस्ती आदी परिसरातील घरात सफाई, रंगरंगोटीचे…

Read More

खेडमध्ये वारस नोंदीसाठी महिला तलाठी, कोतवाल लाच घेताना जेरबंद:5,500 रुपयांची लाच घेताना एसीबीची कारवाई

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वारसनोंदीसाठी 5,500 रुपयांची लाच घेताना एका महिला तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा येथील तलाठी मनीषा साहेबराव माने (वय 45) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय…

Read More

Ambadas Danves Scathing Attack on Maharashtra Govt Over Corruption & Crime

महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात नियम 259 अन्वये विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर चौफेर घणाघात केला. गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांध . महाराष्ट्रात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे आणि मानवी तस्करीच्या घटना चिंताजनक आहे. मागील वर्षात 26 हजार 137 महिला आणि 7…

Read More

हवामानातील बदलामुळे अमरावती जिल्ह्यात मोठा निर्णय:16.85 लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी 3 महिन्यांचे धान्य

हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील १६.८५ लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. हा एकत्रित धान्यपुरवठा एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी असेल. लाभार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार ३० जूनपर्यंत या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात अंत्योदय…

Read More

खासदार वानखडे यांच्या मध्यस्थीने विहिगाव येथील उपोषण स्थगित:रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अंजनगाव सुर्जी: विहिगाव फाटा ते विहिगाव मुख्य रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते फिरोज कुरेशी आणि भगवान अभ्यंकर यांनी हे उपोषण सुरू केले होते. खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दहा दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले….

Read More

दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल:खादगाव–गवारे वस्ती रस्ता; लोकप्रतिनिधींकडून पाहणी, गावकऱ्यांनी मानले आभार‎

खादगाव ते गवारे वस्ती घोडेगाव या तीन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘ दिव्य मराठी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ५ ते ७ वर्षांपासून या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात होता. मात्र, प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने आणि पावसामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झाल्याने २०० हून अधिक शेतकऱ्यांचे हाल…

Read More