Headlines

सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान:विद्याधर अनास्कर यांचे मत, तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन

पुणे येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘सहकार महोत्सवा’च्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान लाभले असल्याचे मत व्यक्त केले. सहकार क्षेत्राला लाभलेल्या सहकार भारतीच्या नेतृत्वामुळे ही चळवळ सर्वार्थाने प्रगती करत असल्याचेही ते म्हणाले. सहकार भारती पुणे विभाग आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन…

Read More

अशोक खरात हा सरकारचाच माणूस:SIT कडून अद्याप ठोस कारवाई नाही, राजकारणी अन् अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न – नाना पटोले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते…

Read More

मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज उद्घाटन:देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावरील भव्य प्रकल्प; काय आहेत मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये?

आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पण आजपासून देशातील या पहिल्या द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचे स्वरुप पूर्णतः बदलणार आहे. आज महाराष्ट्र दिनी या महामार्गावरील प्रवासासाठी मिसिंग लिंकचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर उद्यापासून…

Read More

Amritpal Singh Bail Plea; Ajnala Police Station Attack

अमृतसर2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आसाममधील डिब्रूगड तुरुंगात बंद असलेले खडूर साहिबचे खासदार आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांची आज (11 मे) अमृतसर न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी होणार आहे. ही हजेरी अजनाला पोलीस ठाण्यावर झालेल्या बहुचर्चित हल्ला आणि निदर्शन प्रकरणात घेतली जाईल. मागील सुनावणीदरम्यान, अमृतपाल सिंग यांनी न्यायालयात एक नवीन याचिका दाखल करत…

Read More

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-1 मध्ये आग लागली:धावपट्टी परिसरातून धूर निघाला, गेट बंद केले; काही वेळातच आगीवर नियंत्रण

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 वर गुरुवारी संध्याकाळी आग लागली. अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6:10 वाजता आग लागली. प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग तळमजल्यावर असलेल्या पॉवर…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:छत्रपती संभाजीनगरात दर दिवसाला 10 नैसर्गिक तर वैद्यकीय पद्धतीने 18 गर्भपात, जिल्ह्यात 10,547 गर्भपातांची नोंद

आरोग्य विभागातील ४ जिल्ह्यांमध्ये वर्षभरात अर्थात ३६५ दिवसांत १३,३३७ गर्भपात झाले आहेत. म्हणजेच दिवसाकाठी ३६ गर्भपात झालेत. संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि परभणीचा या विभागात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०,५४७ गर्भपात झाले आहेत. ४ जिल्ह्यांच्या तुलनेत ही टक्केवारी ७९.०८ आहे. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात २८.८९ गर्भपात झाले आहेत. गर्भपाताच्या तुलनेत विभागात एकूण…

Read More

भाजपचे लोक ज्यांना देव मानतात, ते प्रश्नांना घाबरतात का?:मोदी केवळ फिरण्यासाठी परदेशात जातात; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 देशाचा दौरा केला. तिकडच्या पत्रकारांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्यायचे सोडून तुम्ही पळून का जात आहात? नार्वेमधील पत्रकाराने प्रश्न विचारला आणि मोदी पळताना दिसले हे चित्र भारताच्या लोकशाहीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे, असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र…

Read More

चांभुर्डी अवैध मुरूम उपसा प्रकरणात तिसऱ्यांदा पंचनामा:तहसीलदार डोंगरे यांच्या आदेशामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले‎

तालुक्यातील चांभुर्डी येथील शासकीय जमिनीतून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध मुरूम उपसा प्रकरणात महसूल प्रशासनाने अखेर पुन्हा एकदा कारवाईचे पावले उचलली आहेत. तक्रारदार श्रीरंग साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार १५ मे २०२६ रोजी संबंधित जागेचा तब्बल तिसऱ्यांदा पंचनामा करण्यात आला. यापूर्वी झालेल्या दोन पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आक्षेप घेत साळवे यांनी सखोल चौकशीची…

Read More

प्रशांत महासागरातील एल निनो यंदा आपल्या नळाचे 15% पाणी पळवणार:ऑगस्टअखेरपर्यंत पावसाच्या खंडाची चिन्हे म्हणून सर्व शहरांत 15% पाणी कपात करा

राज्यावर यंदा ‘एल निनो’चे संकट घोंगावत आहे. जूनमध्ये हजेरी लावून पावसाला ऑगस्टपर्यंत खंड पडू शकतो, अशी चिन्हे आहेत. म्हणून सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच मनपांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी 15% पाणी कपातीच्या सूचना दिल्या आहेत. ‘एल निनो’चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर…

Read More

राहुल म्हणाले- देश चालवणे मोदींच्या आवाक्यात नाही:सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका यासारखी 7 आवाहने उपदेश नाहीत, अपयशाचे पुरावे

राहुल गांधींनी सोमवारी पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील ‘सात आवाहनांवर’ पलटवार केला. त्यांनी याला अपयश म्हटले. ते म्हणाले की, आता देश चालवणे पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. X वरील एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी लिहिले, ‘काल मोदीजींनी जनतेकडून त्याग मागितला. सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खत…

Read More