Headlines

इर्विनमधील परिचारिकांचा संप तासाभरात स्थगित:पीडित परिचारिकेला न्याय मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) परिचारिकांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. जीएमसीमधील एका पीडित परिचारिकेला न्याय मिळवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, तासाभरातच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. या आश्वासनानंतर परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला इर्विन रुग्णालयासह डफरीन…

Read More

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी खुल्या कारागृहातून पसार:भुईंज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता

येरवडा येथील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून कैद्याचा शोध सुरू आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील अधिकारी नागनाथ भानवसे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More

पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय, महिलेला घरातून उचलले, अज्ञात स्थळी डांबले:मुंबईतील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एका महिलेचे अपहरण करून तिला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर या मुंबईतील…

Read More

UIDAI Website Se Aadhaar Number Pata Karein

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आधार कार्ड आता प्रत्येक कामासाठी आवश्यक दस्तऐवज बनले आहे, पण जर तुम्ही १२ अंकी क्रमांक विसरला असाल किंवा तुमचे कार्ड कुठेतरी हरवले असेल, तर घाबरण्याची काहीच गरज नाही. UIDAI ने अनेक सोपे मार्ग दिले आहेत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या तुमचा आधार क्रमांक जाणून घेऊ शकता. वेबसाइट, SMS, ईमेल आणि माय-आधार ॲपद्वारे…

Read More

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:मनीषा माने-मुसळेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला;आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय दिला. या निकालामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणात नवे वळण आले…

Read More

कुठे पाऊस, कुठे उकाडा!:विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचे सावट, पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यात 'यलो अलर्ट, यवतमाळ- गडचिरोलीत मुसळधार पावसाचे संकेत

महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळत असून, राज्याचा एक भाग पावसाने ओलाचिंब होत असताना दुसरा भाग मात्र उष्णतेने होरपळून निघत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात…

Read More

पुण्यातील IT कंपनीत विश्रांती कक्षावरून नवा वाद:विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी वापर; माधुरी मिसाळ यांचे चौकशीचे आदेश

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या घटनेने राज्यात गदारोळ माजला असतानाच पुण्यातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करून भेदभाव आणि नियमभंग आढळल्यास दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी…

Read More

महालक्ष्मी सरस 2026 ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद:एकाच दिवसात 6 कोटींची विक्रमी उलाढाल, आतापर्यंत 32 कोटींची उलाढाल

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे. ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना…

Read More

महिला अधिकारी नको!:मंत्र्यांच्या भूमिकेवर मनीषा म्हैसकरांचा धक्कादायक खुलासा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वक्तव्याने खळबळ

राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे ती अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मांडलेल्या एका धक्कादायक अनुभवामुळे. त्यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळातील एक प्रसंग उघड करत, 2023 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर एका मंत्र्याने, माझा विभाग चालवायला मला महिला अधिकारी नको, अशी भूमिका घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे प्रशासनातील लिंगभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा…

Read More

भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या जीवनातील अडचणी होतात कमी:राधाकृष्ण महाराज यांचे प्रतिपादन, श्रीमद्भागवत कथेला भाविकांची गर्दी‎

असफल झालेल्या विद्यार्थ्यांना सफल कसे व्हावे याची प्रेरणा भागवत कथेमधून मिळते. विद्या धन प्राप्त करण्यापूर्वी परमात्म्याचे स्मरण आवश्यक असते. दिवसाची सुरुवात भगवंताचे स्मरण करून करावी. आपल्या भारतीय संस्कृतीत भगवंताच्या स्मरणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळ निश्चित करून दररोज भगवंताचे भजन करावे, जीवनातील अडीअडचणी कमी होत चालल्याचे अनुभवास येते. जीवनात यशस्वी होण्याचे आणि आनंद मिळवण्याचे गूज भागवत…

Read More