जायकवाडी धरणामध्ये 1986 नंतर मत्स्यबीज सोडण्यास मुहूर्तच मिळेना:50 हजार मच्छीमार 40 वर्षांपासून वन, मत्स्यव्यवसाय विभागात समन्वयाचा अभाव
जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदा घटत चालली असून १९८६ नंतर धरणात एकदाही शासकीय पातळीवर नियोजनबद्ध रीतीने नवीन मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. तब्बल ४० वर्षांपासून नव्या मत्स्यबीज संचयनाला मुहूर्त न मिळाल्यामुळे जलाशयातील गोड्या पाण्यातील अनेक पारंपरिक माशांच्या प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रशासकीय अनास्थेमुळे धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे ५० हजार पारंपरिक मच्छीमारांचा रोजगार संकटात सापडला आहे….