“पडावं स्वतःच्या प्रेमात अन् पाहावं देवानं काय दिलंय…’:अनघा तांबोळींच्या काव्याने रंगले वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
“साहित्य, कथा, कादंबरी आणि काव्य हे दुसरं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि समाजमनाचा आरसा असते,” असा सूर वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पातून उमटला. “कविता ऐकताना माणूस त्यात पूर्णपणे हरवून जातो; त्यातील आनंद, दुःख, प्रेम आणि . केवळ कौतुक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कवयित्री तांबोळी यांनी त्यांच्या रचनांमधून आजच्या सामाजिक वास्तवातील विदारकता आणि मध्यमवर्गीयांचे…