मान्सून . सुटीच्या दिवशी पावसाच्या सरी; उकाड्यापासून नागरिकांची सुटका:जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दमदार, तर काही ठिकाणी अद्यापही प्रतीक्षा
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर २२ जूनपासून अहिल्यानगर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पावसाचे वितरण संमिश्र असले तरी, ज्या भागात पाऊस बरसला, तिथे शेतीच्या मशागतीच्या कामांनी चांगला वेग घेतला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे….