Headlines

12 वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी:अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांना मिळाले यश

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) १२ वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडातील अत्यंत गुंतागुंतीची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मुलीला नवजीवन मिळाले असून, तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. गाठीमुळे या बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते. त्यामुळे तिला अन्न गिळण्यास, श्वास घेण्यास आणि चालण्यासही खूप त्रास होत होता. गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत…

Read More

“धाकटी पंढरी’त रंगला नयनरम्य रिंगण सोहळा:पैठणहून आणलेल्या गंगाजलाने श्रींना अभिषेक; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी घेतले दर्शन‎

. तालुक्यातील श्रीक्षेत्र वरूर (धाकटी पंढरी) येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. चारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्वयंभू देवस्थानात दिवसभर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल होती. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे श्रीक्षेत्र पैठण येथून कावडीद्वारे आणलेल्या पवित्र जलाने श्रींचा गंगाजलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर लघुरुद्राभिषेक, ग्रामप्रदक्षिणा, हरिनामाच्या…

Read More

प्लॅटिनमवरील आयात शुल्क दुप्पट:डिझेल, हायब्रीड गाड्यांच्या किमती 18 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात

देशात डिझेल एसयूव्ही आणि स्ट्रॉंग हायब्रीड गाड्या खरेदी करणे महाग होईल. प्लॅटिनमवरील प्रभावी आयात शुल्क 6.4% वरून 15.4% पर्यंत वाढणे हे याचे कारण आहे. याचा परिणाम अशा गाड्यांवर होईल, ज्यात प्रदूषण नियंत्रणासाठी मौल्यवान धातू वापरले जातात. ऑटो कंपन्या वाढलेल्या खर्चाचा बोजा थेट ग्राहकांवर टाकू शकतात. यामुळे मध्यम आकाराच्या डिझेल एसयूव्हीच्या किमती 12 हजार आणि स्ट्रॉंग…

Read More

उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला:ते अडीच वर्षे घरी बसले हे राऊत अभिमानाने सांगतात- नवनाथ बन

अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहलेले पुस्तक वाचा, जेव्हा गरज होती त्यावेळी मुख्यमंत्री घरात बसले असा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टीका केली, असे भाजप्र प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे…

Read More

KPIT चे अध्यक्ष रवी पंडित यांचे निधन:वयाच्या 75 वर्षी घेतला अखेरचा श्वास; नवोन्मेष, मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचा अध्याय संपुष्टात

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी केपीआयटी टेक्नोलॉजीचे अध्यक्ष तथा निष्णाता सीए डॉक्टर एस बी (रवी) पंडित यांचे आज पहाटे 5 च्या सुमारास पुणे येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या रुपाने केवळ एका यशस्वी उद्योगपती किंवा सीएचा काळाच्या पडद्याआड गेला नाही, तर दूरदृष्टी, नेतृत्व, नवोन्मेष व मूल्याधिष्ठित कार्यपद्धती यांचा एक प्रेरणादायी अध्याय संपुष्टात आल्याची…

Read More

मुंबईत विकृतीचा कळस! विक्रोळीत 13 वर्षीय बालिकेवर बेकरी मालकाकडून अत्याचार:..तर चारकोप मेट्रो डेपोत महिला अभियंत्याचा विनयभंग

मुंबईतील विक्रोळी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पार्कसाईट परिसरात बेकरी चालवणाऱ्या एका नराधमाने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर 3 ते 4 वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बेकरी मालक नफिस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमान याला…

Read More

बातमी बदलाची:75 गावांनी पाणी साठवले; शेती उत्पन्नही तिप्पट झाले, राज्यात जालन्यात 2016 मध्ये 4 हजार पाण्याच्या टँकर्सची गरज भासली होती

मी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील पासोडी गावात आहे. गेल्या आठवडाभर येथील सरासरी तापमान ४०-४१ अंश सेल्सियसच्या आसपास होते. मराठवाड्याचा हा भाग देशातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त भागांमध्ये गणला जातो. मात्र या वेळी कडक उन्हाळ्यातही येथे पाण्याची कोणतीही टंचाई जाणवली नाही. गावातील सर्व विहिरींमध्ये पुरेसे पाणी आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरींमधून पाइपद्वारे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत आहे. हे सुखद चित्र केवळ…

Read More

JNPA Container Yard Fire; Uran Blaze Engulfs Yard

मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) जवळ, उरण येथील गव्हान फाटा येथे एका माल हाताळणी गोदामात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर यार्डमधील एका शेडम . दृश्यांमध्ये कंटेनर यार्डच्या वर धुराचा प्रचंड लोट दिसत असून, तो दूरवरूनही स्पष्ट दिसत आहे. पनवेलहून अग्निशमन दलाचे…

Read More

‘मयू, हे मला मारत घेऊन चालले आहेत, मला वाचव’:वेरूळचे शिक्षक बोरसे यांची शेवटची ही आर्त हाक असल्याचा मुलीचा " दिव्य मराठी''कडे खुलासा‎

‘माझ्या वडिलांनी फक्त माणुसकीच्या नात्याने वाद काय सुरू आहे ते विचारले. पोलिसांना तुमचे आयडी कार्ड दाखवा अशी विनंती केली. बस, याच गोष्टीमुळे पोलिसांचा इगो दुखावला गेला. त्यांनी वडिलांना तेथेच कानशिलात लगावली. त्यानंतर गाडीत कोंबून मारत नेले. आम्ही त्यांना गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला आणि आईलाही रस्त्यावर फरफटत नेण्यात आले. वडिलांचे शेवटचे शब्द माझ्या…

Read More

मंत्र्यांना घोडेबाजारात रस, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही:केळी उत्पादकांच्या कोट्यवधींच्या नुकसानीवरून एकनाथ खडसेंची टीका

राज्याच्या काही भागांत नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे आणि विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल चार मंत्री राज्य मंत्रिमंडळात असतानाही, केवळ रक्षा खडसे यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही…

Read More