डीएमआयसीतील रासायनिक सांडपाणी नाल्यात:विहिरींच्या पाण्याचा रंग हिरवा, दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, शेतीची सुपीकता घटत आहे
. करमाड डीएमआयसी परिसराचा वेगाने विस्तार सुरू आहे. दुसरीकडे वाढते प्रदूषण, दूषित पाणी, रासायनिक कचरा यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. औद्योगिक सांडपाणी थेट नाल्यांत सोडले जात असल्याचा आरोप आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेल, भूजल स्रोत धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी हिरवट रंगाचे पाणी दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही उद्योगांतून रासायनिक पाणी उघडपणे नाल्यांत सोडले जाते….