Headlines

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎

आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…

Read More

केमिकल दुधाच्या आंतरजिल्हा रॅकेटवर ‘एफडीए’चा प्रहार:पाच जिल्ह्यांत छापे, 1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त; पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जालन्यात कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले. . अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत एकाच वेळी ही धडक…

Read More

पुण्यात तरुणाचा खून, भवानी पेठेत धारदार शस्त्राने वार:पूर्ववैमनस्यातून घटना; खडक पोलिसांनी चौघांना केली अटक

पुण्यातील भवानी पेठेतील काशेवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका १८ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी खडक पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अबूबकर अमजद खान (वय १८, रा. एडी कॅम्प चौक, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अम्मार शेख (वय १९, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), कमरअली…

Read More

लोकशाहीच्या पतनाला कोर्टच जबाबदार!:ठाकरे गटातील फुटीनंतर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांची थेट सर्वोच्च न्यायालयावर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींवर आता ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य करत थेट सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षांतरबंदी कायद्याबाबत स्पष्ट आणि अंतिम भूमिका घेण्यात न्यायालयाने विलंब केल्यामुळेच देशातील राजकीय पक्षांमध्ये वारंवार फूट पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहा…

Read More

सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रात सुसूत्रता:सुहास पटवर्धन यांचे मत, सहकार सप्ताहाच्या समारोपात प्रतिपादन

भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रातील विविध विभागांमध्ये सुसूत्रता आली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत, असे मत महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाला २०२६ मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था,…

Read More

पुणे-बंगळुरू महामार्गावरील शेंद्रे उड्डाणपुलावर सीएनजी गळती:600 किलो गॅस हवेत पसरला, पोलिसांकडून तातडीने उपाययोजना

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड– सातारा मार्गावरील शेंद्रे उड्डाणपुलावर रविवारी सीएनजी वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस निरीक्षक तांबे यांना कळविण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार पोलिस पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. तसेच महामार्ग सुरक्षा पथक आणि राष्ट्रीय…

Read More

पात्र ITI विद्यार्थ्यांना SSC आणि HSSC समकक्ष मान्यता:मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा ऐतिहासिक निर्णय, गोवा ठरले देशातील पहिले राज्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील कौशल्य विकास क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय घेत पात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSSC) समकक्ष मान्यता देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अशी व्यवस्था लागू करणारे गोवा हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च…

Read More

उन्हावर मात करण्यासाठी योगाचा ‘कुल'' मंत्र‎:उष्माघाताच्या धोक्यातून वाचण्यासाठी योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या तीन संजीवनी क्रिया

माढा सोलापूर शहरात उष्णतेचा कहर सुरू असून पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत आहेत. अहिल्यानगरमध्ये कालच उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शरीराला नैसर्गिक शीतलता देणाऱ्या तीन योगिक क्रिया योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या आहेत. या क्रिया अत्यंत सोप्या…

Read More

शंभूनगरात मनपाची कारवाई, 96 अनधिकृत नळ जोडण्या खंडित:150 मिमी उपजलवाहिनीवरील पाणीचोरीवर आळा घालण्यासाठी मोहीम

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शंभूनगर परिसरात मोठी कारवाई करत १५० मिमी उपजलवाहिनीवरील तब्बल ९६ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पाणीचोरीला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार, बुधवारी (दि. १२ जून) ही विशेष मोहीम राबवण्यात आली. त्रिशरण चौकाजवळील शंभूनगर परिसरातून गादिया विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून जाणाऱ्या…

Read More

भोंदू मनोहर भोसलेला पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या?:स्वतःला बाळूमामाचा अवतार समजत होता; फिर्यादीने तक्रारीत काय म्हटले?

सोलापूर पोलिसांनी स्वतःला बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या भोंदू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांत तो जामिनावर असताना आता पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फिर्यादीने त्याची या भोंदूने कशी फसवणूक केली? याची विस्तृत माहिती पोलिसांना दिली आहे. त्यात त्याने आरोपीला…

Read More