Headlines

बनावट औषध विक्री करणाऱ्या रॅकेटवर लागणार मकोका:राज्य सरकारची ग्वाही, चंदीगड-दिल्ली ते इतर राज्ये आणि पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात पसरले जाळे

राज्यात बनावट जीवनरक्षक इंजेक्शन्स व औषधांची विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांविरुद्ध राज्य सरकार आता कठोर पावले उचलणार आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या नावाने बनावट ‘अल्ब्युरेल’ इंजेक्शन विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचे गांभी . बनावट औषधांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी औषध नियमांनुसार प्रायमरी पॅकेजिंगवर ‘क्यू आर कोड’ असणे बंधनकारक केले आहे. आमदार श्रीकांत भारतीय, विक्रांत…

Read More

जुलैत 6 बदल- कमर्शियल सिलेंडर ₹180 ने स्वस्त:पासपोर्ट काढणे महाग; ट्रेनमध्ये तिकीटाशिवाय प्रवास केल्यास लागेल दुप्पट दंड

कमर्शियल सिलेंडर आज म्हणजेच 1 जुलैपासून सरासरी 180 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत तो ₹2930 ला मिळत आहे. तसेच, आता पेट्रोल पंपांवर एका गाडीत एका दिवसात फक्त 200 लिटर डिझेल भरण्याची मर्यादा संपली आहे. याशिवाय, आता पासपोर्ट बनवणे किंवा री-इश्यू करणे महाग झाले आहे. सामान्य पासपोर्टची फी ₹1,500 वरून वाढून ₹2,500 झाली आहे. जुलैमध्ये होणारे…

Read More

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला:ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखलेंना घडवणाऱ्या 'बाई' काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचा एक सुवर्णकाळ संपला असून, कलाविश्वात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले यांसारख्या…

Read More

तिवस्यात उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा:अनेक महिला-पुरुष रस्त्यावर, सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मंगळवार, ३० जून रोजी अनुसूचित जाती (SC) संवर्गातील ५९ जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाची सुरुवात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. आंदोलनाच्या शेवटी, राष्ट्रपतींना उद्देशून एक निवेदन तिवसा तहसीलदारांमार्फत पाठवण्यात…

Read More

अमरावती-दर्यापूर मार्गावर एसटी बस मध्येच बंद पडली.:शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उशीर, प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हुकला

अमरावती-दर्यापूर मार्गावर भातकुलीमार्गे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर झाला. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीहून सकाळी ७ वाजता दर्यापूरकडे निघालेली बस मार्गावरच बंद पडली. बसची स्थिती चांगली नसल्याने हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भातकुली येथे पोहोचायला बसला विलंब झाला. या विलंबामुळे…

Read More

आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते गणवेश, पुस्तके वितरित:अमरावती गर्ल्स हायस्कुलमध्ये शाळा प्रवेशोत्सवाचा शुभारंभ

अमरावती जिल्ह्यात शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी विविध ठिकाणी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कॅम्प परिसर स्थित जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत (गर्ल्स हायस्कुल) विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना मोफत पुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी वृक्षारोपणही केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख,…

Read More

Break Dept Walls, Plan Impact Must Be Seen on Ground

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी सरकारी योजनांचा लोकांच्या जीवनावर होणाऱ्या वास्तविक परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यावर आणि मंत्रालयांमध्ये उत्तम समन्वयासाठी पीएम गतिशक्ती (PM GatiShakti) प्लॅटफॉर्मच्या व्यापक वापराला महत्त्व दिले. बैठकीत दोन प्रमुख विषयांवर चर्चा झाली. पहिला…

Read More

पिंगळाई नदीत बुडून शेतमजुराचा मृत्यू:शेतातील काम संपवून घरी परतताना तोल गेला, तिवसा येथील घटना

तिवसा येथील पिंगळाई नदीत बुडून एका ४३ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. सतीश रंगरावजी गायकवाड (रा. सुरवाडी खुर्द, ता. तिवसा) असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली असून, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश गायकवाड हे तिवसा भाग २ मधील एका शेतात मजुरीने फवारणीसाठी गेले होते. काम संपवून परत येत…

Read More

महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात 'प्रहार'चे स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन:लॅपटॉप फेकून, पत्रके उडवून सक्ती रद्द करण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाने स्मार्ट मीटर सक्ती आणि अवाजवी वीज बिलांविरोधात तीव्र आंदोलन केले. मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळील महावितरण कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मेळाव्याच्या पेंडालमध्ये ठेवलेली पत्रके आणि लॅपटॉप फेकून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या मते, वाढीव आणि अवाजवी…

Read More

बिश्नोई टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार:अनमोल बिश्नोई-प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती

देशभर आणि विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये पाय पसरू पाहणाऱ्या बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. या टोळीचा म्होरक्या अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकर या दोन प्रमुख आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परदेशातून फोन करून भारतीय व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या या टोळीचे संपूर्ण नेटवर्क समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे, अशी…

Read More