Headlines

बाळासाहेबांचा अपमान करण्याचे धाडस माझ्यात नाही:पाळणाघराच्या वक्तव्यानंतर किरण पावसकरांचे स्पष्टीकरण; ठाकरे गटाला सुनावले खडेबोल

ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात सूत्रसंचालन करताना केलेल्या विधानावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते किरण पावसकर यांनी अखेर आपली भूमिका मांडली. “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करण्याचे धाडस मी स्वप्नातही करणार नाही, माझ्या विधानाचा तसा अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण पावसकर यांनी दिले आहे. ठाकरे गटाने पावसकरांच्या माफीची आक्रमक…

Read More

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎

प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

ममतांनी कल्याण बॅनर्जींना लोकसभेतील चिफ व्हीप बनवले:अध्यक्षांना पत्र लिहिले; 20 बंडखोर खासदारांनी काकोलींची केली व्हीपपदी नियुक्ती

तृणमूल काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने रेकॉर्डवर घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. एक दिवसापूर्वी, टीएमसीच्या लोकसभेतील २८ खासदारांपैकी २० जणांनी बंडखोरी करत ममतांची साथ सोडली…

Read More

अंबादास दानवे यांच्या पत्नीच्या नावावर मर्सिडीज बेन्झ:संपत्तीतही मोठी वाढ; विधान परिषद उमेदवारांच्या संपत्तीची मोठी झेप

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 30 एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ठरला असून 12 मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. एकूण 9 जागांसाठी ही निवडणूक होत असून, भाजपकडून 5, शिवसेना शिंदे गटाकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 1 आणि शिवसेना ठाकरे गटाकडून 1…

Read More

देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार:एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ, तुम्ही संविधान अन् राष्ट्रप्रेमी नाही हेच यातून सिद्ध होतंय- संजय राऊत

देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार आहे, त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ आहे, या देशात फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल. इतर कोणताच प्रादेशिक पक्ष राहणार नाही, या दृष्टीने शिवसेना फोडली, त्यासाठी यंत्रणेचा वापर केला, पासवान यांचा पक्ष तसाच फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा…

Read More

भागवताच्या माध्यमातून कृष्ण‎कथा सुख-आनंद प्रदान करते‎:पू. राजेशकृष्णजी महाराज, जल्लोषात झाला रुक्मिणी विवाह साेहळा‎

प्रतिनिधी |अकोला कृष्ण भक्ती ही सरळ व सोपी असून, कृष्ण हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक आहे. भागवताच्या माध्यमातून कृष्ण कथा या सुख व आनंद प्रदान करून जीवन जगण्याची प्रेरणा देत असल्याचा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत…

Read More

मतदान गर्दीचे नियमन करेल रोबोट:डॉ. सोलापुरेंच्या संशोधनाला पेटंट, वाचा रोबोटची वैशिष्ट्ये

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी लातूरमधील राज्यशास्त्राचे अभ्यासक व संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. लातूरचे लेखक व अभ्यासक डॉ. राजशेखर सोलापुरे आणि त्यांचे सहकारी डॉ. रवींद्र माळी, डॉ. वैभव सूर्यवंशी, डॉ. सचिन वेरुळकर आणि डॉ. शेखर आष्टीकर यांनी विकसित केलेल्या ‘स्वायत्त मतदार सहाय्य रोबोट’ला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत पेटंट मंजूर केले…

Read More

भारत अन् बांगलादेशाला जोडणारा सांस्कृतिक धागा धर्मापेक्षाही बळकट:बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांचे मत‎

भारत आणि बांगलादेश हे दोन स्वतंत्र देश असले तरी हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती हा दोन्ही देशांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. हा धागा धर्मापेक्षाही जास्त बळकट आहे. मात्र, सध्या दोन्ही देशात धर्मावर आधारित द्वेष आणि हिंसा वाढू लागल्याने उपखंडातील संस्कृतीचे विघटन होत आहे, असे परखड मत बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांनी व्यक्त केले….

Read More

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- सनातन धर्म संपवला पाहिजे:हे लोकांना विभाजित करते; आधी डेंग्यू, मलेरिया सांगितले होते, यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते

तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, लोकांना विभाजित करणाऱ्या सनातन धर्माला निश्चितपणे संपवले पाहिजे. त्यांनी तमिळ थाई वाझ्थुला प्रत्येक सरकारी कार्यक्रमात प्राधान्य देण्याची मागणीही केली. उदयनिधींनी नुकत्याच झालेल्या शपथविधी समारंभाचा उल्लेख करत आरोप केला की, तामिळनाडूचे पारंपरिक तमिळ आवाहन गीत ‘तमिळ थाई वाझ्थु’ला कार्यक्रमात तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात आले, तर परंपरेनुसार त्याला…

Read More

सायबर फ्रॉड कॉल सेंटर; 35 खाती:198 सिमकार्ड अन् सहा कोटींचा घोटाळा उघड, चार महिन्यांपासून गोव्यात सेंटर सुरु, नेमणूकीपूर्वी दिले जाते प्रशिक्षण‎

मोर्शी तालुक्यातील काटपूर येथील एका गरजू व्यक्तीला सात हजार रुपये देऊन त्याच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात आले. त्यानंतर त्याच गावातील आणखी सात जणांची बँक खाती उघडून घेण्यात आली. ही खाती उघडून घेणारा व्यक्ती अमरावती येथील राकेशकुमार झामण . दरम्यान याच गुन्ह्याच्या तपासात ग्रामीण पोलिसांच्या सायबर पथकाने थेट गोवा गाठत तेथे अनधिकृतरीत्या सुरू असलेले सायबर…

Read More