वीजपुरवठा सततचा खंडीत, पिकांचे नुकसान:6 तास विनाअडथळा विजेचे आश्वासन; आंदोलन मागे
सततच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ढोराळे, इर्ले आणि मानेगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तडाखेबंद उन्हामुळे आधीच पिके संकटात सापडली असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेकडो शेतकऱ्यांनी हातात कुलूप घेऊन थेट वैराग येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी…