Headlines

फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान:पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक…

Read More

अद्याप तोडगाच नाही; कर्मचाऱ्यांचे आंदोलन:काळ्या फिती लावून काम, उद्यापासून देण्यात येणार धरणे‎

विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला जिल्ह्यात तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांसह विद्यापीठाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. दरम्यान आगामी सोमवारपासून भोजनावकाशात आपापल्या संस्थेसमोर धरणे, निदर्शने केली जाणार आहेत. शुक्रवार, १४ मेपासून हा लढा सुरु झाला. महासंघाचे अध्यक्ष…

Read More

राहुल म्हणाले- विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही:CBI संचालक निवडीवर असहमती, पंतप्रधानांच्या घरी बैठक; म्हटले- उमेदवारांचे तपशील दिले नाहीत

राहुल गांधींनी मंगळवारी पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या बैठकीत नवीन सीबीआय संचालकांच्या निवडीवर आपली असहमती दर्शवली आहे. राहुल गांधींनी आरोप केला की, निवडीसाठी दिलेल्या 69 उमेदवारांच्या यादीची माहिती उपलब्ध करून दिली नाही. राहुल म्हणाले- सीबीआय संचालकांची निवड प्रक्रिया केवळ एक औपचारिकता बनवण्यात आली आहे. मी या पक्षपाती कामात सहभागी होऊन माझ्या संवैधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही. पण…

Read More

पत्रकारांनी एआय शिकणे काळाची गरज – मिलिंद खांडेकर:स्मृती व्याख्यानात 'एआय क्रांती: पत्रकारिता बहरेल की ओसरेल?' विषयावर मत

इंडिया टुडे समूहाच्या ‘तक’ वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी शनिवारी पुण्यात सांगितले की, गुगल माहितीची लायब्ररी होती, तर चॅटजीपीटीसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधने थेट उत्तरे देणारे प्राध्यापक बनले आहेत. यामुळे माहिती मिळवण्याची आणि बातम्या वाचण्याची पद्धत वेगाने बदलत असून, पत्रकारांनीही एआय शिकणे काळाची गरज आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश यांच्या…

Read More

नसरापूर प्रकरणात निर्घृणतेची परिसीमा:चिमुरडीच्या मृत्यूमागील भीषण वास्तव समोर; पोस्टमार्टम रिपोर्टमधून गंभीर बाबी उघड

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या अहवालात नमूद झालेल्या निरीक्षणांमुळे घटनेचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले असून, या प्रकरणातील क्रौर्य स्पष्ट होते. ससून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे अहवाल सादर केल्यानंतर या घटनेबाबत पुन्हा संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच या प्रकरणामुळे राज्य…

Read More

उष्णतेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज:नागपुरात उभारणार राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था – मंत्री गिरीश महाजन

वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. उष्णतेसारख्या आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ठोस प्रणाली निर्माण केली जात असून यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली….

Read More

तीव्र उन्हामुळे करा पालेभाज्या, फळांचे सेवन:उन्हाळ्यात महिला, लहान मुलांना ऊन लागण्यासह बळावतात इतर आजार‎

उन्हाच्या झळांमुळे उष्माघाताची शक्यता असल्याने आहारतज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ व महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी दहा वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उकाडा असह्य होत आहे. यामुळे या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तीव्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमान ४५ अंशांच्या…

Read More

जिल्ह्यात 2.42 लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, 15 ते 20 मे या कालावधीत पाठ्यपुस्तके पोहोचणार; जिल्ह्यातील शाळांमध्ये वाटप‎

यंदाच्या शैक्षणिक सत्र २०२६ – २७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २,१४१ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकूण दोन लाख ४२ हजार ७५५ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे शाळा स्तरावर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाच्या वतीने बालभारती पोर्टलवर पुस्तकांची मागणी एप्रिल मध्ये नोंदवली आहे. पुस्तका अभावी शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये,…

Read More

छत्रपती संभाजीनगरात जागतिक हिवताप दिन साजरा:जनजागृती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मलेरिया विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २५ एप्रिल २०२६ रोजी जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिनानिमित्त क्रांती चौकातील…

Read More

रुग्णालयातील पांढऱ्या वस्त्रातील ‘दूत’ अन् आरोग्याच्या ‘आशा’:नर्सिंग कॉलेजमध्ये रंगला सेवेचा सन्मान, कार्यक्रमात सेवाभावी वृत्ती जोपासण्याचे केले आवाहन‎

रुग्णालयातील पांढऱ्या गणवेशातील परिचारिका असो किंवा वस्तीपातळीवर घरोघरी फिरणारी आशा सेविका, समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात या दोघींचेही योगदान एखाद्या योद्ध्याप्रमाणे आहे. सामाजिक आरोग्य सेवा तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्यात परिचारिकांइतकाच आशा सेवि . आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून गुलमोहर रोडवरील प्रयत्न नर्सिंग कॉलेजमध्ये याच सेवेचा अनोखा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रांतील…

Read More