Headlines

विरमगावच्या सरपंच पदी मंगल करपे यांची निवड:एकूण ६०२ मतदानापैकी ३१३ मते मिळाली

प्रतिनिधी |फुलंब्री नुकत्याच पार पडलेल्या विरमगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत श्री भैरवनाथ शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या उमेदवार मंगल विश्वनाथ करपे यांनी २६ मतांनी विजय मिळवत सरपंच पदावर ताबा मिळविला. एकूण ६०२ मतदानापैकी त्यांना ३१३ मते मिळाली. विजयानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सोमनाथ करपे, उपसरपंच कारभारी करपे, सुनंदा करपे, वैष्णवी करपे, सविता गायकवाड,…

Read More

वांद्रे रेल्वे परिसरात अतिक्रमणावर हातोडा:कारवाईला स्थानिकांचा विरोध, पोलिसांवर बाटल्या फेकल्या; गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज

मुंबई येथील वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना काही ठिकाणी गोंधळ उडल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईला काही स्थानिक लोकांकडून विरोध करण्यात आला. यावेळी काही जणांनी पोलिसांवर बाटल्या, बादल्या तसेच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांकडूनही सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. तसेच ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा प्रशासनाने निर्धार केल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी…

Read More

लढायची वेळ आली की कोणाला तरी पुढे करतात:विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे व काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. लढायची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. तसेच गोरगरीब, शोषित आणि दिव्यांगांच्या हितासाठी शिवसेना सदैव कार्यरत असल्याचे सांगत, त्यांनी बच्चू…

Read More

विद्यार्थ्यांनी टक्केवारीचा विचार न करता आत्मविश्वासाने यश गाठावे:अविनाश ठाकरे; माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव‎

प्रतिनिधी |अकोट दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहावी व बारावीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन माळी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी टक्केवारीचा विचार न करता आत्मविश्वासाने यश गाठावे, असे प्रतिपादन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी याप्रसंगी केले. अकोट शहरात राम नारायण मंगल कार्यालयात सत्कार सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय…

Read More

शक्तिपीठ महामार्ग मोजणीचा प्रशासनाचा निमगावच्या शेतकऱ्यांनी डाव उधळला:माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे पोलिसांसमोर आत्मदहनाचा शेतकऱ्यांचा प्रयत्न‎

. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी माळशिरस तालुक्यातील निमगाव परिसरातील बाधित जमिनींच्या जीपीसी मोजणीस शुक्रवारी शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवत प्रशासनाचा डाव उधळून लावला. सकाळी ६ ते ११ वाजेदरम्यान सुरू असलेल्या या वादग्रस्त प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला मोजणी प्रक्रिया स्थगित करावी लागली….

Read More

बार्शीत नऊ दिवसाआड पाणीपुरवठा:296 कोटी ख र्चाच्या कामात महामार्ग व शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनाचा वाद‎

शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती अत्यंत बिकट आणि तीव्र पाणीटंचाईची आहे. सध्या बार्शीकरांना ४ ते ६ दिवसाआड किंवा काही भागात ८ ते ९ दिवसांनंतर विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत (३० जून २०२६) आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. बार्शी शहराला दररोज २ कोटी ५० लाख (अडीच कोटी)…

Read More

देवगाव रंगारी येथे वीरशैव बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी:सुनील गोंधळे यांनी जीवनचरित्राविषयी माहिती दिली

देवगाव रंगारी | ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला कन्नड पंचायत समिती उपसभापती माया सुराशे यांच्या वतीने ललित सुराशे, गोकुळ गोरे व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुनील गोंधळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे ग्रामीण अध्यक्ष सुभाष भायभंग, काकासाहेब…

Read More

पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर जाती,कुळाचे बंधन नष्ट होते- रामदास महाराज:शिऊर येथील संत शिवाई मंदिरात निळोबा महाराज गाथा पारायणाची सांगता‎

देवाची अनन्य भक्ती करताना व पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर संतांचे सांसारिक जाती व कुळाचे बंधन पूर्णपणे नष्ट होते. ईश्वरभक्तीत एवढी तल्लीनता असते की त्यांना समाज किंवा नात्यागोत्यांनी दिलेल्या लौकिक दर्जाची किंवा भेदाभेदाची कोणतीही पर्वा नसते, असे प्रतिपादन रामदास महाराज पवार यांनी शिऊर येथे केले. संत शिवाई मंदिरात अधिक मासानिमित्त श्री संत निळोबा महाराज गाथा पारायण…

Read More

रोहित पवारांचे CID च्या रिकाम्या खुर्चीला निवेदन:रिकाम्या खुर्चीलाच जबाब नोंदवून घेण्याची मागणी; अघोरी पूजेविषयी बारामतीच्या नेत्याचा उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी येथील सीआयडी कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे त्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन बीएनएसएस कलम 180 अंतर्गत आपला जबाब नोंदवण्याची विनंती केली. त्यांच्या या गांधीगिरीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी…

Read More

उषा साठे हत्येप्रकरणी अकलूज बंद; बाजारपेठांमधील बहुतांश व्यवहार ठप्प:योद्धा प्रतिष्ठानच्या हाकेला व्यापाऱ्यांची साथ; आरोपी देशमुख याला शिक्षा देण्याची मागणी‎

अकलूज चौडेश्वरवाडी येथील उषा विजय साठे हत्येच्या निषेधार्थ योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या अकलूज बंदला शहरातील व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद दिला. दवाखाने व मेडिकल वगळता बहुतांश व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अकल . प्रांत कार्यालयावर धडकला बहुजन समाजाचा मोर्चा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सकल बहुजन समाजाच्या वतीने अकलूज येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा…

Read More