Headlines

HDFC Bank Top Gainer; Market Cap Rises ₹35,808 Cr

मुंबई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात चढ-उतारादरम्यान, देशातील टॉप-10 सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात म्हणजेच मार्केट कॅपमध्ये एकूण 92,995.48 कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमध्ये खाजगी क्षेत्रातील दिग्गज HDFC बँक आणि टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आघाडीवर राहिले. दुसरीकडे, इतर सहा कंपन्यांना बाजारातील मंदीमुळे नुकसान सोसावे लागले आणि त्यांच्या…

Read More

तटकरे पोहोचण्याआधीच प्रफुल्ल पटेल सिल्व्हर ओकवर उपस्थित होते:राष्ट्रवादीच्या राजकारणात सस्पेन्स; मोठ्या राजकीय हालचालींची चाहूल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन वरिष्ठ नेत्यांना संघटनेत दुय्यम स्थान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांचे नाव मागे…

Read More

विराट कोहलीला भेटल्यानंतर बदलले चिमुकल्याचे आयुष्य:सेलिब्रिटी बनला, सर्वजण म्हणतात- ज्युनियर चीकू, 3 कंपन्यांच्या जाहिराती केल्या, मॉडेलिंगच्याही ऑफर मिळाल्या

स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला भेटल्यानंतर हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी गर्वित उत्तमचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. आता त्याला सेलिब्रिटी म्हणून महत्त्व दिले जात आहे. सर्वजण त्याला ज्युनियर चीकू म्हणजेच ज्युनियर विराट कोहली असेच म्हणतात. या सगळ्या असूनही, मैदानावर गर्वितचे वर्तन तसेच आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाही. पंचकुला येथील CL चॅम्प क्रिकेट अकादमीमध्ये सराव करणारा…

Read More

जुन्या वादातून मित्राचा खून; जळगावच्या खुनाचा उलगडा:बिडकीन ठाण्यात गुन्हा, दीड महिन्यानंतर आरोपीस अटक‎

पैठण तालुक्यातील ७४ जळगाव फाटा येथील विष्णू बबन मोरे (३४) याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला तब्बल दीड महिन्यानंतर खुनाचे वळण मिळाले आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी विष्णूची लाकडी दांड्याने डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, बिडकीन पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. ढाकेफळ येथील विष्णू मोरे हा २१ मार्च २०२६ रोजी रात्री…

Read More

भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा…

Read More

कामगार दिनी विद्युत भवनामध्ये लाईनमनच्या पुतळ्याचे अनावरण:‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित‎

प्रतिनिधी| अकोला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विद्युत भवन येथे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिमंडळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे आयोजित…

Read More

कर्नल पुरोहित यांना वर्षभरात दुसऱ्यांदा प्रमोशन:आता ब्रेगिडियर पदावर पदोन्नती; गत सप्टेंबर महिन्यात झाली होती कर्नलपदी बढती

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीकांत पुरोहित यांची गतवर्षी सप्टेंबर महिन्यातच कर्नलपदी बढती झाली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच त्यांना पुन्हा एकदा पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे हे विशेष. कर्नल श्रीकांत पुरोहित हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट…

Read More

पुण्यात 67,956 थकबाकीदारांनी अभय योजना धुडकावली:सजग नागरिक मंचाचा सवाल, महापालिका प्रशासनावर कारवाईचा दबाव

पुणे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबवण्यात आलेल्या अभय योजनेला हजारो सराईत थकबाकीदारांनी धुडकावून लावल्याचे समोर आले आहे. एकूण ६७,९५६ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. या पार्श्वभूमीवर, अशा थकबाकीदारांवर महापालिका प्रशासन नेमकी कधी आणि कोणती कारवाई करणार, असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ मार्च…

Read More

पाषाण तलाव संवर्धनासाठी 8 कोटींचा निधी खर्च नाही:महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो मासे आणि जलचरांचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही. या दुर्लक्षामुळे तलावातील हजारो मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी (एनडीएमए) पुणे महापालिकेला कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तीन तलावांच्या…

Read More

Pune IT Company Faces Allegations of Religious Harassment and Forced Resignation

Marathi News National Pune IT Company Faces Allegations Of Religious Harassment And Forced Resignation पुणे12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुण्यातील एका महिलेने विप्रो टेक्नॉलॉजीज कंपनीवर धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि जबरदस्तीने राजीनामा घेतल्याचा आरोप केला आहे. ही महिला यापूर्वी या कंपनीत काम करत होती. हे आरोप पुण्यातील हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात…

Read More