Headlines

ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अजिंठा घाटामध्ये ट्रक उलटला:लसणाने भरलेला ट्रक जात होता केरळला‎

अजिंठा घाटातील वळणावर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लसणाने भरलेला एक ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही बचावले असून, ट्रकचे नुकसान झाले आहे. राजस्थानहून केरळच्या दिशेने लसूण घेऊन जाणारा ट्रक (आरजे २० जीसी ४३८१) मंगळवारी सकाळी अजिंठाघाटात…

Read More

आशिया-आफ्रिकेत ईव्हीची मागणी वेगवान:चीनमध्ये प्रत्येक 10 पैकी एक कार ईव्ही, भारतात दोन आणि तीन चाकी विभागामध्ये 25% वाढ

इराण युद्धानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) मागणी वेगाने वाढली आहे. आशियातील बहुतेक देशांमध्ये, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मार्चमध्ये ईव्हीच्या विक्रीत 79 टक्के वाढ झाली आहे. या देशांमध्ये 2025 मध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री 48 टक्क्यांनी वाढली होती. लॅटिन अमेरिकन देश कोस्टा रिका हे इलेक्ट्रिक…

Read More

तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन:तरुणाने घरात घुसून दिली धमकी; बीडमधील खळबळजनक प्रकार

बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून, केज आणि अंबाजोगाई येथे दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. केजमध्ये एका तरुणाने एका घरात बेकायदेशीर प्रवेश करून, मुलीचे लग्न लावून न दिल्यास तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या घटनेत अंबाजोगाई येथे एका 28 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केल्याचा…

Read More

नसरापूर पीडितेच्या वडिलांचा राजकीय नेत्यांना इशारा:जोपर्यंत आरोपीला फाशी नाही, तोपर्यंत भेटू नका

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेतील पीडित चिमुरडीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने भेटू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. मुलीच्या अस्थी विसर्जनासाठी देहू येथे गेले असताना, त्यांनी समाजमाध्यमाद्वारे एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत माझ्या मुलीला पूर्ण न्याय मिळत…

Read More

राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत:त्यांना या विषयातले काय कळते? महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंची टीका

लोकसभा महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्ती आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने मांडलेले विधेयक बहुमताअभावी नामंजूर झाले असतानाच, सरकारने रात्रीतून अधिसूचना काढून 2023 चा कायदा लागू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नेमके काय साध्य करायचे होते? असा सवाल करत केंद्र सरकारला धारेवर धरले. मात्र, राज ठाकरेंच्या…

Read More

आलियाबादऐवजी अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागामध्येच ‘जीएमसी’ व्हावे:आमदार संजय खोडके यांची पुन्हा एकदा मागणी‎

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे आलियाबाद येथील प्रस्तावित जागा वन विभागाच्या अखत्यारीतील ‘आयडेंटीफाईड फॉरेस्ट’ क्षेत्रात येत असल्याने कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही जागा बदलून शहराच्या मध्यवर्ती भागातील पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सभागृहात केली. आमदार खोडके म्हणाले की, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर…

Read More

लासलगाव कचरा डेपो नवीन जागेत स्थलांतरित करावा:नागरिकांचे माजी खासदार भुजबळ यांना निवेदन‎

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून येथील शिवनदी संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव शहर विकास समिती व परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांचा…

Read More

'शांत मन – द सीक्रेट ऑफ लाईफ' पुस्तकाचे प्रकाशन:मनाची शांती समजण्यासाठी नैसर्गिक नाते गरजेचे – डॉ. संप्रसाद विनोद

आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी ‘मनाची शांती समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबर नैसर्गिक नाते निर्माण करण्याची गरज’ असल्याचे मत व्यक्त केले. लेखक कौस्तुभ साबळे यांच्या ‘शांत मन – द सिक्रेट ऑफ लाईफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. आयुष प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, प्रसिद्ध नाटककार डॉ….

Read More

आरोग्य विभागाच्या पदभरतीमधील अनियमिततेवरून पालकमंत्री झिरवाळांची नाराजी:दोषींवर कारवाईचे दिले आदेश, जिल्हा नियोजन समितीची बैठक

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी पदभरतीमधील दिरंगाई व अनियमितता यावरून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया वादात सापडणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने रविवारी ता. 4 झाली. यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांच्यासह खासदार रामराव वडकुते,…

Read More

हेल्मेट सक्ती, वाहतुकीचे नियम पाळा:अपघात झाल्याच्या स्थितीत जखमींना तत्काळ मदत करा, पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांचे आवाहन

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी सोमवारी ता २० येथे केले. येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक निलाभ रोहन म्हणाले की हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून अपघाताचे प्रमाण हे लक्षणीय…

Read More