![]()
शाळेला सुट्टी म्हणून गल्लीतील मुलांनीमातीचे गणपती बनवले… खेळता-खेळतागणपतीपुढे प्रसाद म्हणून एरंडीच्या बियावाटल्या आणि १३ मुलांनी त्या खाल्ल्या.दुपारचा हा निरागस खेळ काही तासांतच गंभीरवळणावर पोहोचला. सायंकाळी एकामागोमागमुलांना पोटदुखी, उलट्या आणि अस्वस्थतेचात्रास सुरू झाला अन् कापूसवाडगावातीलचर्चमागील गल्लीमध्ये खळबळ उडाली.अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने पालकांचीझोप उडाली. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारासही घटना घडली. वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात आधी पाचआणि त्यानंतर आणखी आठ अशा १३ मुलांनादाखल करण्यात आले. ड्यूटीवरील डॉ. हर्षलधाबे यांनी तातडीने उपचार सुरू केले. सर्वमुलांना २४ तास वैद्यकीय निगराणीखालीठेवण्यात आले असून शुक्रवारी कोणालाहीसुटी देण्यात आली नव्हती. बियांत विषारी घटक एरंडीच्या बियांमध्ये ‘ रायसीन’ हेविषारी घटक असते. रायसीन हेमानवी शरीरातील पेशींची प्रथिनेबनवण्याची क्षमता नष्ट करते,एरंडीच्या बीचे बाह्य कवच तुटूनजर बी चावली तर हे विष शरीरातशोषले जाते. बिया खाल्यास तीव्रमळमळ आणि उलट्या होतात. अधिकारी दाखल एकाचवेळी १३ जणांनाविषबाधेची लक्षणे जाणवल्याचीमाहिती मिळताच जिल्हा आरोग्यअधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारीवैजापूर उपजिल्हा रुग्णालयातपोहोचले. पथकाने डॉक्टरांकडूनप्रकृती आणि उपचारांची माहिती घेतली. १३ बालकांवरउपचार सुरू कल्याणी आव्हाड (११),प्राची त्रिभुवन (११), आयुषत्रिभुवन (५), आर्यनत्रिभुवन (११), अनुपत्रिभुवन (९), जयश्रीआव्हाड (१८), खुशीआव्हाड (११), अंजलीपवार (११), राधिकाआव्हाड (११), केवल्याजनगरे (३), सुप्रिया त्रिभुवन(१४), साहिल आव्हाड(१८) आणि रोहिणीआव्हाड (१४) यांच्यावरउपचार सुरू आहेत. यामुलांच्या रक्ताचे नमुनेप्रयोगशाळेत पाठवले आहेत.
Source link
प्रसाद म्हणून एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळेकापूसवाडगावात 13 मुलांना विषबाधा:उलट्या, अस्वस्थतेचा त्रास : मुले वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल