Headlines

मध्य प्रदेशात मान्सून पुन्हा सक्रिय:बिहारमध्ये 44 लाख लोकसंख्येला पुराचा विळखा, यूपीच्याही 26 जिल्हांत पूरस्थिती




मध्य प्रदेशात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारी भोपाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. बिहारमध्ये पूरस्थिती कायम आहे. 14 जिल्ह्यांमधील 2,360 गावांमध्ये 44 लाख लोक पाण्याने वेढलेले आहेत. राज्यातील 8 नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुरामुळे 27,954 लोक मदत शिबिरांमध्ये आहेत. उत्तर प्रदेशात गंगा-यमुनासह 10 हून अधिक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 26 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 4 लाख लोकसंख्या प्रभावित झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील 54 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. राजस्थानमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अलवरमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. रस्ते पाण्याखाली गेले. सैटेलाइट नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पहा देशभरातील हवामानाचे फोटो देशभरातील हवामानाशी संबंधित अपडेट्ससाठी खालील ब्लॉगमधून जा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *