संकटांची मालिका संपेना; हतबल शेतकऱ्यांची मोसंबी बागांवर कुऱ्हाड:मोसंबीवर रोगराईचा वाढला घाट, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची बिकट वाट
दत्तात्रय मुळे | ढोरकीन सतत हवामान बदल, अवकाळी पाऊस, पडलेले बाजारभाव, आटोक्यात न येणारी प्रचंड रोगराई, उन्हाच्या तीव्र झळा व पाण्याची कमतरता यामुळे पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर मोसंबी बागेवर अखेर कुऱ्हाड चालवण्याची व जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बागा उपटून फेकण्याची वेळ आली. अनेक शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या बागा प्रामुख्याने रोगराई आटोक्यात न आल्याने व पाण्याअभावी सुकू…