जनगणना देशाच्या विकासाचा पाया; गाफील राहू नका:देवळाली प्रवरा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
प्रतिनिधी | राहुरी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाचा पाया आहे,” असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ, निधीचे नियोजन आणि सामाजिक-आर्थिक धोरणांची आखणी ही…