Headlines

जनगणना देशाच्या विकासाचा पाया; गाफील राहू नका:देवळाली प्रवरा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी | राहुरी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाचा पाया आहे,” असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ, निधीचे नियोजन आणि सामाजिक-आर्थिक धोरणांची आखणी ही…

Read More

"पैस' खांबाच्या साक्षीने वारकऱ्यांवर होणार मोफत उपचार:डॉ. जगधने

प्रतिनिधी | नेवासे ज्या पैस खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी प्रकट केली, त्या पवित्र खांबाच्या साक्षीने आज एका डॉक्टरने मानवतेची शपथ घेतली. वैशाख शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात झालेल्या महाआरतीनंतर डॉ. जगधने यांनी आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकरी भक्तांना मोफत उपचार देण्याचा संकल्प जाहीर केला. माऊलींच्या दर्शनाने मिळालेली ही अनुभूती असल्याची भावना त्यांनी यावेळी…

Read More

अखेर विवेक कोल्हेंना विधान परिषदेची उमेदवारी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पुनर्वसनाचा दिलेला शब्द पाळल्याची चर्चा

प्रतिनिधी | कोपरगाव २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या हितासाठी माघार घेणारे भाजपचे तरुण नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोल्हे यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीने विधान परिषदेसाठी ५ जणांना उमेदवारी जाहीर केली. यात कोपरगाव येथीलविवेक कोल्हे यांचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या…

Read More

पाळधीत फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण, रक्तदान शिबिर:सेवा हेच खरे व्रत या भावनेतून उपक्रम

प्रतिनिधी | पाळधी जीपीएस ग्रुपतर्फे मंगळवारी अत्याधुनिक फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण, रक्तदान शिबिर झाले. सेवा हेच खरे व्रत या भावनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह व गावात मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजे दरम्यान जिल्हा…

Read More

पर्यटक व्हिसावर येऊन पुण्यात धर्मप्रसार:3 अमेरिकन नागरिकांना 'लीव्ह इंडिया'ची नोटीस, 10 मे पर्यंत देश सोडण्याचे पोलिसांचे आदेश

पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. “ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे,” असे सांगत पत्रके वाटणाऱ्या या तिघांनाही येत्या १० मे २०२६ पर्यंत भारत सोडून जाण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले आहेत. इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

Sensex Surges 300 Points to 77,200

Marathi News Business Sensex Surges 300 Points To 77,200 | Nifty Jumps 100 Points; Auto, IT Stocks Shine मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २९ एप्रिल रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३०० अंकांच्या वाढीसह ७७,२०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १०० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तो २४,१०० वर व्यवहार करत आहे….

Read More

पोलिस चौकीसमोर ५० फुटांवर फोडले दुकान:पहाटे ४.३० वाजेची घटना : गस्तीवरील पाेलिसांचे पथक पुढे जाताच चाेरट्यांनी मारला डल्ला‎

प्रतिनिधी | जळगाव शनिपेठ आणि आसोदारोड परिसरात लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने एकाच रात्रीत दोन दुकाने फोडली. शनिपेठ परिसरातील भिलपुरा पोलिस चौकीपासून अवघ्या ५० फुटांवर असलेले एक मेडिकल चोरट्यांनी फोडले. पहाटे चार वाजेपर्यंत पोलिस गस्तीवर होते. ते परतताच साडेचार वाजता चोरट्यांनी डल्ला मारला. यानंतर या टोळीने आसोदा रोडवरील एक हार्डवेअरचे दुकानही फोडले. दिलीप अनंत…

Read More

मोदी काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले, 108 बटूंनी केला शंखनाद:14 किमीच्या रोड शोमध्ये फुलांचा वर्षाव, पंतप्रधानांनी हात हलवून अभिवादन केले

काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 14 किलोमीटर लांबीचा रोड शो केला. ते बीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसवरून काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले. गेटवरच 108 बटूंनी शंखनाद करत त्यांचे स्वागत केले. आता ते बाबा विश्वनाथांचे दर्शन-पूजन करत आहेत. रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्ते ढोल-ताशांवर नाचताना दिसले. पंतप्रधानांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. ताफ्यावर फुले उधळण्यात आली. पंतप्रधानांनी हात हलवून…

Read More

UP मधील बांदा सलग दुसऱ्या दिवशी सर्वात उष्ण, तापमान 45.6°C:राजस्थानमध्ये धुळीचे वादळ, उष्णतेपासून दिलासा नाही; उत्तराखंड-हिमाचलमध्ये गारपीट

देशातील अनेक शहरे उष्णतेच्या लाटेच्या (हीटवेव) विळख्यात आहेत. बहुतेक भागांमध्ये तापमान 40-46°C च्या दरम्यान आहे. मंगळवारीही उत्तर प्रदेशातील बांदा हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे पारा 45.6°C नोंदवला गेला. याशिवाय, ओडिशातील झारसुगुडा येथे 45.3°C, महाराष्ट्रातील अकोला, वर्धा आणि अमरावती येथे 45°C पेक्षा जास्त तापमान होते. भीषण उष्णता आणि उष्माघातापासून वाचवण्यासाठी प्रयागराजमध्ये जागोजागी वॉटर एटीएम…

Read More

धार्मिक:बाभूळगावच्या सप्ताहात दीड हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात कलशाची मिरवणूक

. सिल्लोड तालुक्यातील बाभूळगाव बु.येथे विठ्ठल रुखुमाई मंदिर वर्धापन दिनानिमित्त मंगळवार (दि.२१) रोजीपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला होता. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह,भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप मंगळवारी (दि.२८) रोजी काल्याच्या कीर्तनाने झाला. या समारोपप्रसंगी सकाळी संपूर्ण गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वरी पारायण व…

Read More