Headlines

समान निधी, कृषी-पशुसंवर्धन, शिक्षण, टंचाईच्या मुद्यांवरून प्रशासन धारेवर:ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना सदस्यांनी घेरले‎

जिल्हा परिषदेतील प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदा झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी निधीचे समान वितरण, टंचाई, कृषी-पशुसंवर्धन अन् शिक्षण या ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नावरून पदाधिकारी अन् अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नवोदीत सदस्यांनी अभ्यास . चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेत पहिल्यांदा स्पष्ट बहुमतासह भाजपची सत्ता आली. त्यानंतर विषय समिती सभापती अन् सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. शुक्रवारी (दि. १५)…

Read More

उजनीतील गाळ उपशाचे ठरलं:शेतकऱ्यांना जमीन सुपिकतेसाठी होणार उपलब्ध, गाळमिश्रित वाळू वेगळी करून मक्तेदाराला विक्रीची मुभा

. राज्यातील धरणांची कमी होत चाललेली पाणी साठवण क्षमता आणि अनियंत्रित वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनीसह सहा मोठ्या प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्त्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उजनी धरणात सध्या तब्बल १९.२५ टीएमसी गाळ साचला असून, या निर्णयामुळे कागदावरचे पाणी खऱ्या अर्थाने धरणात साठण्यास मदत होणार…

Read More

विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कारांची शिदोरी असावी:कामती खुर्द येथे श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचा करिअर मेळावा; गुणवंतांचा सत्कार‎

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हाती केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शिस्त आणि संस्कारांची शिदोरी असावी, या जिद्दीतून कामती खुर्द येथील एम. बी. चव्हाण गुरुकुल येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि ‘१० वी नंतर पुढे काय?’ हा करिअर मार्गदर . या कार्यक्रमात लातूर पॅटर्नचे तज्ज्ञ ऋषिकेश जवळगे यांनी पालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आजच्या काळात शाळा-कॉलेजच्या…

Read More

कामाला यश:डिकसळ- कोंढार चिंचोली पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त, 55 कोटींच्या पुलासाठी नेत्यांचा पाठपुरावा फळाला

करमाळा करमाळा तालुक्यातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि पश्चिम भागातील जनतेसाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या डिकसळ-कोंढार चिंचोली नवीन पुलाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. राजकीय अडथळे आणि संथ गतीमुळे रखडलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ब्रिटिशकालीन पुलाला जड वाहनांची बंदी सध्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा जुना पूल ब्रिटिशकालीन असून तो अत्यंत जीर्ण झाला आहे….

Read More

मोहोळ तालुक्यात पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा

ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांची सोय याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण करा, अशा कडक सूचना आमदार राजू खरे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. मोहोळ तहसील कार्यालय येथे आयोजित विशेष बैठकीत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना’ अंतर्गत मतदारसंघातील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला,…

Read More

पेट्रोलच्या निर्यातीवर ₹3 प्रति लिटर कर लावला:डिझेल आणि एटीएफवरील शुल्क कमी केले, देशातील टंचाई रोखण्यासाठी घेतला निर्णय

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ₹3 प्रति लिटरपर्यंत वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने तेल कंपन्यांसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवर ₹3 प्रति लिटर विंडफॉल टॅक्स लावला आहे. डिझेल आणि जेट इंधनावरील कर कमी केला आहे. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. भारतात तेलाची…

Read More

वाचनातून समृद्ध झालेला माणूसच अभिनयाला खरी उंची देतो- सोमण:अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेचे थाटात उद्घाटन‎

पुस्तकांचे वाचन माणसाला वैचारिक प्रगल्भता देते, तर अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना होणारे माणसांचे वाचन जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करते. जो कलाकार साहित्याचा व्यासंग ठेवतो आणि अवतीभवतीच्या माणसांचे वाचन करायला शिकतो, तोच अभिनयातून उत्तमोत्तम भूमिका जिवंत करू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते योगेश सोमण यांनी केले. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक वसंत…

Read More

कांद्याला मातीमोल भाव, रस्त्यावर टाकून निषेध:प्रतिकिलो एक रुपया ते 11 रुपयांचा भाव, शेतकऱ्यांचा आंदोलनात संताप‎

मशागत, खते, किटकनाशक तसेच मजुरी याचा खर्च वाढता असला, तरी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला मात्र मागील चार ते पाच वर्षांत काही दिवसांचा अपवाद वगळता समाधानकारक भाव मिळाला नाही. वाढलेला उत्पादन खर्च व तुलनेत घसरत असलेले बाजारभाव यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यापार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग अडवून, रस्त्यावर कांदा ओतला. सरकारविरोधी जोरदार…

Read More

तीव्र उन्हामध्ये कांदा काढणीला आला वेग

सध्या बाजारात कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसला, तरी “शेती थांबत नाही’ हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील शेतांमध्ये सध्या कडक उन्हाची पर्वा न करता कांदा काढणीची मोठी लगबग सुरू आहे. परिसरातील आळे, संतवाडी, कोळवाडी, लवनवाडी, राजुरी, तांबेवाडी, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज नंबर एक व दोन या गावांमध्ये मजुरांच्या साहाय्याने…

Read More

उसाचे एकरी १०० टन उत्पादनासाठी अत्याधुनिक पद्धत वापरावी- थोरात

“ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना सभासद व ऊस उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. कारखान्याला जास्त इथेनॉल व वीज निर्मितीसाठी उसाची मोठी गरज असल्याने, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी,” असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री…

Read More