Headlines

MVA चे विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर मतैक्य:काँग्रेस 8, ठाकरे 4, शरद पवार गट 3 जागा लढवणार; नांदेड, नाशिकवर तिढा

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज झालेल्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा बव्हंशी सोडवण्यात यश मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माहितीनुसार, 17 पैकी तब्बल 15 जागांवर आघाडीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये एकमत झाले. त्यात काँग्रेसने 8, उद्धव ठाकरे गटाने 4, तर शरद पवार गटाने 3 जागांवर दावा केला आहे. उर्वरित 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असली तरी,…

Read More

साताऱ्यात शरद पवार गटाचा एल्गार:महागाई, इंधन दरवाढ, पेपरफुटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैलगाडीतून केलेली प्रतीकात्मक एंट्री. इंधनाच्या वाढत्या किंमतींविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी हा…

Read More

नाशिकच्या जागेवर भाजपचे गणेश गिते ठाम‎:मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी खलबते‎, दोन कट्टर समर्थक उमेदवारीवरून आमनेसामने

महायुतीमधील जागा वाटपाचा ‎नाशिक आणि जळगाव या दोन‎ जागांवरून महायुतीतील घटक‎ पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू ‎आहे. अशातच कुंभमेळा मंत्री गिरीश ‎महाजन यांचे खंदे समर्थक गणेश गिते‎ यांनी नाशिकच्या जागेवर थेट दावा‎ ठोकल्याने राजकीय हालचालींना वेग‎ आला आहे. नाशिकची जागा‎ भाजपलाच सुटणार असल्याचा ठाम‎विश्वास व्यक्त करत माध्यमांशी‎ संवाद साधताना गणेश गिते यांनी ‎निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले‎…

Read More

उदय सामंतांवर महेश शिंदेंचा जोरदार पलटवार:म्हणाले- माझं नाव घेण्याचं धैर्य त्यांच्यात नाही; साताऱ्यात शिवसेनेतील संघर्ष उफाळला

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फलटणमधील मेळाव्यात नाव न घेता केलेल्या टीकेला कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य नाही, अशा कठोर शब्दांत महेश शिंदे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. या वादामुळे साताऱ्यातील शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चर्चेत…

Read More

देशात 106% पाऊस अपेक्षित:यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक, जूनमध्येही चांगला पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) 2026 साठीचा आपला सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात मान्सूनचा जोर चांगला राहील, असे संकेत कृषी क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक मानले जात आहेत. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार, सध्या पॅसिफिक महासागरात निर्माण…

Read More

London Coffee Prices Soar; Demand Remains Strong

लंडन7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लंडनच्या कू ब्रिजवर एका व्हिंटेज इटालियन कॉफी कार्टबाहेर लांब रांग लागली आहे. धावपटू, पर्यटक आणि श्वानांना फिरायला घेऊन जाणारे, सर्वजण हातात कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात करू इच्छितात. पण कार्ट चालवणारे अँथनी डकवर्थ यांचे लक्ष ग्राहकांपेक्षा किमतींवर जास्त आहे. त्यांच्याकडे आइस्ड लाटे 4.5 पाउंड (580 रुपये) मध्ये मिळते. किंमत 5 पाउंड (644…

Read More

जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर लवकरच निर्णय:संघटनेची सरकारसोबत 7 वर्षानंतर झाली बैठक, इतर मागण्यांवरही झाली चर्चा

राज्यातील जिल्हा परिषदेसाठी लवकरच स्वतंत्र विद्युत विभाग स्थापनेवर निर्णय घेण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी ता. 27 मुंबईत झालेल्या अभियंता संघटनेच्या बैैठकीत दिले आहे. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षाच्या पाठपुराव्यानंतर हि बैठक झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत अभियंत्यांची प्रश्‍न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. रिक्तपदे भरणे, 2005 पुर्वी जाहिरात असलेल्या पण नियुक्ती…

Read More

NIA ची राजस्थानसह 4 राज्यांमध्ये छापेमारी:दहशतवादी हल्ले आणि स्फोटांच्या कटात छापा, पाकिस्तानी डॉनचे नेटवर्क लक्ष्यावर

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने राजस्थानसह 4 राज्यांमध्ये आज छापे टाकले आहेत. एजन्सीच्या पथकांनी 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. ही कारवाई पाकिस्तानचे ऑपरेटिव्ह जसवीर चौधरी आणि गँगस्टर शहजाद भट्टी यांच्या दहशतवादी मॉड्यूलविरोधात केली जात आहे. राजस्थानमध्ये अजमेर आणि नीमराणा (बहरोड-कोटपुतळी) येथे एजन्सीने छापे टाकले आहेत. केंद्रीय एजन्सी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईदरम्यान अनेक…

Read More

मान्सून 7 दिवसांनी केरळात पोहोचेल:वादळी वाऱ्यांमुळे श्रीलंकेत अडथळा; 10% कमी पावसाचा अंदाज, जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट राहील

देशात मान्सूनचे आगमन उशिरा झाले आहे. हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, श्रीलंकेतील कमी दाबाच्या वादळी वाऱ्यांमुळे मान्सून 7 दिवसांनंतरच केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकेल. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून पोहोचण्याची सामान्य तारीख 1 जून मानली जाते. यापूर्वी हवामान विभागाने 26 मे पर्यंतच मान्सून येण्याचा अंदाज वर्तवला होता. अशा प्रकारे, मागील अंदाजानुसार मान्सून सुमारे 10 दिवसांनंतर देशात दाखल होईल….

Read More

रामदास आठवलेंनी काढला मनोज जरांगेंचा चिमटा:म्हणाले – जरांगे माझे चांगले मित्र, ते पण कलाकार, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न!

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उद्यापासून पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा चिमटा काढला आहे. मनोज जरांगे माझे चांगले मित्र आहेत. ते सुद्धा एक चांगले कलाकार आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण मुख्यमंत्री मराठा समाजाच्या बाजूने आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी आज…

Read More