विदर्भात उष्णतेची लाट कायम:चंद्रपूर आणि वर्ध्यात हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
राज्याच्या काही भागांत गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट अद्यापही कायम असल्याने नागरिक उन्हाच्या कडाक्याने प्रचंड हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळी लोक घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याच भीषण तापमानाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने…