लाखो मुंबईकरांसाठी आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना थेट पत्र:सेस-नॉन सेस इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या चार मागण्या
मुंबईतील सेस आणि नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. विशेषतः जुन्या आणि धोकादायक अवस्थेतील इमारतींच्या दुरुस्ती तसेच पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री विशेष निधीतून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी…