गुजरातमधील 2002 च्या पॅटर्ननुसार देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र:हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप
भारतीय जनता पक्ष २०२९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभर धार्मिक तेढ निर्माण करत असून, २००२ च्या गुजरात दंगलींप्रमाणेच हिंसाचार घडवण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केला. पाच राज्यातील निवडणुकीनंतर काही राज्यांत सुरू झालेला हिंसाचार हा याच मोठ्या कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार…