Headlines

राष्ट्र विकासासाठी त्याग करणारा शेतकरी आजही वंचित:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनी सुरेखाताई ठाकरे यांचे मत

राष्ट्र विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शेतकरी हा समाजातील एकमेव घटक आहे, परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी आजही आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले. त्या अमरावती येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या कार्यक्रमाला…

Read More

वाकीतील महिला बचत गट 'फार्मर कप 2026' साठी सज्ज:सेंद्रिय शेती आणि गावाच्या विकासासाठी पुढाकार

भातकुली तालुक्यातील वाकी येथील महिलांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेती विकास, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. कृषी यंत्रणेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वाकी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गावात नुकत्याच आयोजित मार्गदर्शन शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून…

Read More

पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार!:19 वर्षीय मद्यधुंद तरुणाची भरधाव कार गरवारे पुलावरून खाली कोसळली, गुन्हा दाखल

पुण्यात पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची धक्कादायक घटना घडली असून, दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या अथर्व अमित जैन (वय 19) या तरुणाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या कारने थेट गरवारे पुलाचे रेलिंग तोडून खाली कोसळल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या गंभीर निष्काळजीपणाबद्दल डेक्कन पोलिस ठाण्यात आरोपी तरुणावर…

Read More

युवक काँग्रेसची 'आवाज महाराष्ट्राचा' मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका

अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या आंदोलनात्मक मोहिमेची घोषणा केली. शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी प्रभाग पद्धतीची स्वच्छतेची कंत्राटे रद्द करून नियम व…

Read More

एनडीएच्या 150 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनात 'सारंग'चे हवाई प्रात्यक्षिक:महिला कॅडेट्सच्या तिसऱ्या तुकडीच्या पदवीदान सोहळ्यानिमित्त भव्य प्रदर्शन

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) च्या १५० व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त भारतीय हवाई दलाचे ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रदर्शन पथक हवाई प्रात्यक्षिक सादर करणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एनडीएच्या महिला कॅडेट्सची तिसरी तुकडी पदवीधर होत आहे. सशस्त्र दलांमध्ये लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. एनडीए ही…

Read More

कांदिवली सोने चोरी प्रकरण:मोबाईल बंद करून पळालेल्या आरोपींना पाकिस्तान सीमेवर अटक; चारकोप पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक

मुंबईतील चारकोप पोलिसांनी कांदिवलीत झालेल्या एका मोठ्या सोने चोरीप्रकरणी उल्लेखनीय कामगिरी करत जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेलगत असलेल्या पुंछ जिल्ह्यातून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय स्तरावर पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांचे कसब पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे….

Read More

अमृता फडणवीसांची सायकलस्वारी!:पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल, दैनंदिन कामांसाठी सायकल वापरण्याचा निर्धार; VIDEO

आपल्या गाण्यांनी आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या इंधन बचत मोहिमेतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल केला असून, आता घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरातील दैनंदिन कामांसाठी त्यांनी थेट सायकलचा वापर करण्यास सुरुवात…

Read More

नागपूर पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई:हॉटेल मालक अंमली पदार्थांचा किंगपिन, 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त

नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. उमरेड येथे दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करत पोलिसांनी थेट झारखंड राज्यात धाड टाकली. या कारवाईत टोळीचा म्होरक्या असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू आणि २३ लाख ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह…

Read More

गुंदवली-डीएन नगर मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी:बोरीवलीतील समस्यांवर आमदार संजय उपाध्याय यांची BMC आयुक्तांशी भेट

बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी बुधवारी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन बोरीवली परिसरातील नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक सुविधा आणि रखडलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी मेट्रो सेवा, अतिक्रमण, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण आणि अवैध गतिविधींसह अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. बीएमसी आयुक्तांनी विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. गुंदवली-डीएन नगर…

Read More

अर्थखाते मागूनही मिळत नसल्याची सुनेत्रा पवारांची खंत:CM देवेंद्र फडणवीस म्हणाले- माझ्यापर्यंत त्यांची कोणतीही नाराजी आलेली नाही

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आले आहे. सध्या पक्षवाढीसह स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र, उपमुख्यमंत्रिपद मिळूनही अजितदादांकडे असलेले महत्त्वाचे अर्थखाते अद्याप सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. अर्थखाते न मिळाल्यावरून सुनेत्रा पवार…

Read More