दिनवाडा परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा:सोलार पॅनल उडून शेतकऱ्यांचे नुकसान.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
परिसरात सोमवारी (२५ मे) झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांसह विविध मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे सर्कलमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासूर स्टेशन गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांनी सांगितले आहे. दिनवाडा येथील शेतकरी तथा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य…