Headlines

दर्यापूर येथील अतिक्रमित सुरक्षा भिंतीसह जिना हटवला:जयस्तंभ चौकातील अतिक्रमणांवरही कारवाईचे संकेत‎

नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील रहिवासी परिसर असलेल्या काही भागात कारवाई करण्यात आली. अतिक्रमित जागांवर उभारण्यात आलेले जीने, पॅसेज, सुरक्षा भिंत तसेच इतर बांधकामांवर बुलडोझर चालवून नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली. शहरात काही ठिकाणी अतिक्रमीत जागेवर बांधकाम करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यापूर्वी…

Read More

परीक्षा गैरप्रकारांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎:ग्राहक कल्याण परिषदेचे पदाधिकारी आक्रमक; सखोल चौकशीची केली मागणी

सध्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार आणि विशेषतः नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या . ग्राहक कल्याण परिषदेने ‘नीट’सह सर्व स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, पेपरमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई…

Read More

मुख्य चौकातील वाईन‎ शॉपी बंद करण्यात यावी:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन

अमरावती शहरातील राहाटगाव चौक, विद्युत नगर चौक, तपोवन चौक अशा मुख्य व गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या वाईन व बिअर शॉपींमुळे परिसरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी व उपद्रवी प्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त कार्यालय…

Read More

हस्तांतरणाचा तिढा अद्याप कायमच; ‘जीएमसी’चे तिसरे वर्ष अडचणीमध्ये:डीन म्हणतात, तिन्ही रुग्णालये हवीत, तर यंत्रणा म्हणते गरजेनुसार घ्या‎

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीत पुन्हा अडथळा निर्माण झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) अद्याप पूर्णपणे ‘जीएमसी’ प्रशासनाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे पेच निर्माण झाला. या दिरंगाईची दखल घेत राष . दुसरीकडे इर्विनचा ताबा न घेतल्यामुळे जीएमसीत द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थी डॉक्टरांना दैनंदिन प्रात्याक्षिके करणे कठिण झाले असून, पुढील सत्रातील प्रवेशावरही प्रश्नचिन्ह…

Read More

सर्वस्वाचा त्याग करणारे शेतकरी,पण आज तेच वंचित हे योग्य नाही:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनात सुरेखा ठाकरे यांचे मत‎

‘उदात्तता बाळगून राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे शेतकरी आहे.परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे,’ असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखा ठाकरे यांनी व्यक्त केले. . येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वर्धापनदिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या…

Read More

पळसोदच्या बंधाऱ्यात टंचाईतही पाणी; शेतकऱ्यांना आधार:भीषण उन्हाळ्यातही भूजलपातळी कायम; परिसरातील विहिरींना मिळाली नवसंजीवनी

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४६ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडल्यामुळे जनजीवन अक्षरशः होरपळून निघत आहे. अनेक भागांमध्ये विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या पडल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा अत्यंत भीषण परिस्थितीत अकोट तालुक्यातील पळस . जलसंधारण विभागाने उभारलेला हा बंधारा आज कडक उन्हाळ्यातही जलपातळी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बंधाऱ्यात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध…

Read More

इंधन दरवाढीचा निषेध:महागाईविरोधात महिला काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, "मेलाेडी चॉकलेट’ वाटप करत सरकारवर टीका‎

वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसने एल्गार पुकारात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत प्रतीकात्मक निषेध म्हणून “मेलोडी चॉकलेट’चे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. गोरगरीब सामान्य जनतेला आज…

Read More

मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन; रस्त्यावर दारु पिणारे रडारवर, वरिष्ठ पोलिस अधिकारी, गुन्हे शाखेचे पथके तैनात‎

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली २६ मे रोजी रात्री दहा ते पहाटे दोन वाजेपर्यंत शहर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवले होते. या वेळी पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यांवर दारु पिणारे, दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करु देणारे बियर शॉपी मालक, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई केली…

Read More

करमाळ्यात वादळी वाऱ्याने 6 एकर केळी बाग जमीनदोस्त:पूनवर येथील शेतकरी अरुण धुमाळ यांचे 25 लाखांचे नुकसान

करमाळा तालुक्यात सोमवारी दि. २५ मे रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. पूनवर येथील केळी उत्पादक शेतकरी अरुण धुमाळ यांच्या सहा एकरांवरील केळी बागेला या वादळाचा जबर फटका बसला असून संपूर्ण केळी बाग भुईसपाट झाली आहे. या नुकसानीत त्यांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात…

Read More

खरिपाच्या तोंडावर बोगस बियाणांचे फुटले पेव‎:निर्मल सीड्सच्या विश्वास वाणाची नक्कल; बार्शीत 7.50 तर अक्कलकोटमध्ये 8.46 लाख रुपयांचे बियाणे जप्त‎

. अक्कलकोट कृषी विभागाने स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगांव ता. परांडा जिल्हा धाराशिवचे प्रोपरायटर रत्नाकर कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीचे उडीद पिकाचे वाण एनयुएल ७ विश्वास बॅगची हुबेहूब नक्कल करून आबा कृषी सेवा केंद्र अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ४३२ बॅग व त्यांनी विक्री केलेले ४८ असे एकूण ४८० बॅग (प्रति ५…

Read More