Headlines

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवार अपात्र!:निवडणूक खर्चाचा हिशोब न देणे भोवले, विभागीय आयुक्तांची धडक कारवाई

पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी धडक कारवाई केली असून, पुणे महानगरपालिकेतील 22, पंढरपूर नगरपरिषदेतील 15 आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील 3 अशा एकूण 40 उमेदवारांना 26 मे 2026 पासून पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईअंतर्गत अपात्र घोषित करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयासह…

Read More

पेरणी हंगाम पूर्वीच आर्वीत बनावट बोगस बियाणे रॅकेटवर धाड:आर्वीत २९ लाखांचे बोगस बियाणे जप्त

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभाग आणि पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली आहे. आर्वी तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे एका गोदामावर छापा टाकून तब्बल २९ लाख ४६ हजार ८४६ रुपये किमतीचा एचटीबीटी (HTBT) बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ५२ वर्षीय आरोपीला…

Read More

मी दिल्लीला आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले:पण मी मजेत असतो, कोणाच्या पोटात दुखतंय ते बघत असतो; उपमुख्यमंत्री काय म्हणाले?

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवरून भाजप व शिवसेनेत एकमत होत नसल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या दोनपैकी एक जागा भाजपला मिळावी अशी मागणी होत असतानाच, दुसरीकडे जळगावच्या जागेसाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार अत्यंत आग्रही असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आज…

Read More

विधान परिषद निवडणुकीसाठी एकही नामांकन नाही:तीन दिवसांत 4 उमेदवारांनी 5 अर्ज उचलले; ईदमुळे आज सुटी

अमरावती विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकही नामांकन दाखल झाले नाही. बुधवारी चार उमेदवारांनी एकूण ५ अर्जांची उचल केली. उमेदवारी अर्ज उचलण्याच्या पहिल्या दिवशी (सोमवार) १६, दुसऱ्या दिवशी (मंगळवार) २३ आणि तिसऱ्या दिवशी (बुधवार) ५ असे एकूण ४४ अर्जांची उचल करण्यात आली आहे. गुरुवार, २८ मे…

Read More

अचलपूर येथील पाटस्करांचा देहदानाचा संकल्प:पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार

अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी सुरेशराव ताराचंद पाटस्कर यांनी मरणोत्तर देहदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरले आहे. पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हा संकल्प केला असून, यामुळे समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. समाजकार्याची आवड जपणारे सुरेशराव पाटस्कर यांनी ‘मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देणं लागतं’ या भावनेतून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसह सुनबाई उपस्थित होत्या. पुण्यात…

Read More

शेतकऱ्यांसाठी नवे ॲप:खत खरेदी घरबसल्या, आयएफएमएस-ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘फर्टीलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम’ (FSAS) नावाचे नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या खतांचे बुकिंग करता येणार आहे, ज्यामुळे त्यांची गैरसोय टळणार आहे. राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत, आयएफएमएस (IFMS) आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) या प्रणालींचे एकत्रीकरण करून हे ॲप तयार करण्यात आले आहे….

Read More

नीट पेपरफुटीविरोधात ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी

सध्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार आणि विशेषतः नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली….

Read More

अमरावती जीएमसी हस्तांतरणाचा तिढा कायम:तिसरे वर्ष अडचणीत, डीनला तिन्ही रुग्णालये हवीत; यंत्रणा म्हणते गरजेनुसार घ्या

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक वाटचालीत पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) अद्यापही पूर्णपणे जीएमसी प्रशासनाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे तिसरे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी), वैद्यकीय शिक्षण परिषद आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या दिरंगाईची गंभीर दखल घेतली आहे. इर्विनचा ताबा न घेतल्यामुळे जीएमसीतील…

Read More

जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला:अमरावती आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

अमरावती शहरात जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जनगणना सुरू असताना ही घटना घडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावती महानगरपालिकेकडून संबंधित कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जनगणना कर्मचारी स्वस्तिक नगर परिसरात घरोघरी माहिती संकलित करत होते. त्यावेळी एका घरात एक वृद्ध महिला गंभीर अवस्थेत आढळली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रसंगावधान…

Read More

मणीबाई हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी 'विकसित भारत बिल्डथॉन'मध्ये प्रथम क्रमांक पटकावला:अटल टिंकरिंग लॅब ठरली उपयुक्त, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी ‘केंद्र शासन पुरस्कृत विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या जीविका नलगे आणि रिया कांबे या विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले. त्यांनी कठोर मेहनत, नावीन्यपूर्ण विचार आणि जिद्दीच्या जोरावर तंत्रज्ञान…

Read More