Headlines

दिल्ली तुघलकाबाद अपघात- पैशाच्या वादातून आग लावली:अल्पवयीन मुलगी आत गेली, पेट्रोल शिंपडले; गाड्यांमध्ये स्फोट, अपघातात 3 जणांचा बळी गेला होता

दिल्लीतील तुघलकाबाद येथे 12 जून रोजी पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीत नवीन खुलासा झाला आहे. पोलिसांनी आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. ज्यात एक अल्पवयीन मुलगी आग लागण्यापूर्वी आत जाताना दिसली, ती बाहेर येताच स्फोट झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे अल्पवयीन मुलीला पकडले. तिने कबूल केले की गोविंद पुरीच्या गिरीनगर येथील रहिवासी सरिता (27) हिने तिला…

Read More

सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:'ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी'प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून…

Read More

अचलपुरात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले दालनाची मागणी:नगरसेविका अपर्णा रोडेंनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रेरणादायी दालन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका अपर्णा जितेंद्र रोडे यांनी ही मागणी केली असून, त्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन सादर करताना आमदार प्रवीण तायडे, नगराध्यक्ष रूपाली माथने आणि सुधीर रसे यांच्यासह अनेक मान्यवर…

Read More

डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार:मोर्शी, वरुड रुग्णालयातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरव

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शस्त्रक्रिया आणि रक्तदानाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तसेच दोन्ही रुग्णालयांच्या कायापालटासाठी त्यांना गौरविण्यात आले. हा सत्कार श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने…

Read More

मोर्शी कॉलनी परिसरात पाणी टंचाई, गढूळ पाण्याचा पुरवठा:नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन, 5 दिवसांत शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह स्थानिकांनी नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने यांना निवेदन दिले. येत्या पाच दिवसांत शुद्ध व मुबलक पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्शी शहरात जुन्या आणि नवीन…

Read More

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे?

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या टपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांत भेसळ केल्याचे उघडकीस आल्यास थेट मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश मुंढे यांनी दिल्याने भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले…

Read More

अधिकाऱ्यांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित:सीईओ सत्यम गांधींनी घेतला विकास योजनांचा आढावा

अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे उत्तरदायित्व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शनिवारी, सुटीच्या दिवशी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांचा निपटारा आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत वेळेत…

Read More

रोहित पवारांचं उपोषण म्हणजे 'जरांगे स्टाईल नौटंकी:भाजप आमदार परिणय फुकेंची टीका, म्हणाले- 'अन्नत्याग'ऐवजी 'मीडिया त्याग' करावा

शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षनेत्यांचा वाढता पाठिंबा मिळत असला तरी, सत्ताधारी नेत्यांकडून मात्र यावर जोरदार टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ…

Read More

TMC खासदारांचे दोन्ही गट लोकसभा अध्यक्षांना भेटले:अभिषेक यांची मागणी- वेगळ्या गटाला मान्यता देऊ नका, बंडखोरांची भाजप बंगाल प्रभारींच्या घरी बैठक

दिल्लीत तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर नेत्या काकोली घोष दस्तीदार, शताब्दी रॉय आणि त्यांच्यासोबत इतर नेते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यापूर्वी बंडखोर गटाची केंद्रीय मंत्री आणि बंगालमध्ये भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या घरी बैठकही झाली. दुसरीकडे, TMC चे खासदार कीर्ति आझाद आणि सागरिका घोष देखील बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. बैठकीनंतर…

Read More

मानवाधिकार असोसिएशनची आयुक्तांकडे तक्रार, नगरपालिका प्रशासनावर चालढकलचा आरोप:अचलपूर नगर परिषदेतील अनियमिततेवर कारवाईची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनावर कामकाजात चालढकल केल्याचा आरोप करत तक्रार केली आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून, न.प. प्रशासन विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अचलपूर येथील किशोर केशवराव मोहोड यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे तक्रार केली होती….

Read More