Headlines

स्वच्छ प्रशासनासाठी आम्ही अविश्वास ठरावालाही सामोरे जाण्यास तयार:नगराध्यक्ष वडजे यांची माहिती, नाईकवाडींचा नगराध्यक्षपदावर दावा

हाच तो इस्लाम पेठेतील निकृष्ट रस्ता, एकाच महिन्यात उखडल्यावर जेसीबी मशीनने उखडून फेकला. प्रतिनिधी | अकोले अकोले नगरपंचायतीमधील भारतीय जनता पक्ष आघाडीच्या गटनेतेपदावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय वळण लागले आहे. भाजपचे विद्यमान गटनेते बाळासाहेब वडजे यांच्याविरोधात अविश्वास दाखवत माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी गटनेतेपदावर दावा ठोकला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अकोले…

Read More

निसर्गाचे रक्षक, पर्यावरण वाचवण्याची जिद्द:जंगल तोडायचे असेल तर आधी मला तोडा; आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठांची कहाणी

या 3 प्रातिनिधिक कथा अशा वृद्धांच्या आहेत, जे 60 वर्षांहून अधिक वयाचे असूनही निसर्गाचे ऋण फेडत आहेत. कुणी हजारो झाडे लावली, हजारो एकरमध्ये जंगल उभे केले तर कुणी नद्यांना पुनरुज्जीवित केले. पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील 81 वर्षीय दुखू माझी. गेल्या 60 वर्षांपासून झाडे लावत आहेत. ते आजही सायकलवर दोन टिनच्या डब्यांमध्ये पाणी, कुदळ आणि फावडे…

Read More

समाजात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण:संजीवनीचे माजी विद्यार्थी हेच या संस्कारांचे जिवंत उदाहरण- आमदार विवेक कोल्हे

प्रतिनिधी |कोपरगाव इंजिनिअर चुकला तर त्याचे बांधकाम बाधित होईल, डॉक्टर चुकला तर रुग्ण दगावू शकतो; पण जर शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते. म्हणूनच समाजात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण आहे. संजीवनीचे शिक्षक खऱ्या अर्थाने उत्तम काम करत असून आज जगभरात यशस्वी असलेले संजीवनीचे माजी विद्यार्थी हेच या संस्कारांचे जिवंत उदाहरण आहेत, असे प्रतिपादन…

Read More

मयत मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना MIDC मध्ये नोकरी:सरकारकडून आदेश जारी, मनोज जरांगे म्हणाले- मी समाधानी नाही

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे भर उन्हात पुकारलेले आमरण उपोषण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले आहे. सरकारच्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केल्यावर शासनाने यासंदर्भात नुकताच एक आदेशही जारी केला आहे. मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. मात्र…

Read More

गुजरातेत 12 सिंह, मध्य प्रदेशात 10 वाघांचा मृत्यू:CDV विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा दावा, वनविभागाने अद्याप अहवाल जारी केला नाही

एशियाटिक सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातच्या पूर्व आणि पश्चिम गिर जंगलात 12 सिंहांच्या मृत्यूचे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत पोहोचले आहे. वन विभागाने 30 हून अधिक सिंहांना पशु काळजी केंद्रात ठेवले आहे. मात्र, सिंहांचा प्रयोगशाळा अहवाल अद्याप जारी करण्यात आलेला नाही. अशीच स्थिती मध्य प्रदेशातील वाघांची आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्पात 2 एप्रिलपासून आतापर्यंत 10 वाघांचा मृत्यू झाला आहे….

Read More

महबूब खानने नाव बदलले आणि फातिमा नर्गिस बनली:नर्गिस यांच्या 97व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित रंजक किस्से

‘आवारा’, ‘श्री 420’ आणि ‘मदर इंडिया’ यांसारख्या कल्ट चित्रपटांची अभिनेत्री नरगिस दत्त फक्त एक स्टार नव्हत्या, तर हिंदी सिनेमाचा एक वारसा होत्या. आपल्या कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नरगिस यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रोमांचक किस्से जाणून घेऊया. नरगिस यांचा जन्म अशा कुटुंबात झाला, जिथे कला आणि संगीत वारशाचा भाग…

Read More

हट्टा येथे वर्चस्वाच्या वादातून दाेन गटांत ‎हाणामारी:एक ठार, 7 जखमी, 3 गंभीर‎; गावामध्ये तणाव, वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात‎

वसमत तालुक्यातील हट्टा येथे रविवारी‎(३१ मे) मध्यरात्रीच्या सुमारास बाजार‎चौकात दोन गटांत झालेल्या हाणामारीत‎चाकूचा वार झाल्याने रुद्र दस्तके या‎तरुणाचा मृत्यू झाला. यात सात जण‎जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर‎आहे. त्यांच्यावर परभणी येथील खासगी‎रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात‎तणावपूर्ण शांतता आहे. वाढीव पोलिस‎बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎वसमत तालुक्यातील हट्टा येथे वर्चस्वाच्या‎वादातून काही दिवसांपासून दोन गटांत…

Read More

आठवले कुठेही जाणार नाहीत याचा अर्थ गृहीत धरावे असे नाही:रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा; विधान परिषदेत डावलल्याची खंत

बकरी ईदच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून नुकताच भाजपला घरचा आहेर देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता ट्विटरवर पोस्ट करत महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मला किंवा माझ्या आरपीआय पक्षाला कोणीही गृहीत धरू नये, असे ठणकावून सांगत त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हक्काची जागा मिळण्यासह आगामी महामंडळ वाटपातही पक्षाला योग्य वाटा मिळण्याची मागणी केली आहे. मित्रपक्षांना दिलेल्या या…

Read More

सिवनीमध्ये विहीर कोसळली, आई-मुलगी ढिगाऱ्याखाली दबल्या:दोन जेसीबीच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले; आजी रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेशातील सिवनी येथे तराईच्या वेळी नव्याने बांधलेल्या विहिरीची रिंग आणि भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली आजी, आई आणि मुलगी दबल्या. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. 75 वर्षीय समानिया बाई जंघेला यांना बाहेर काढण्यात आले. अनुसुइया जंघेला (41) आणि तिची मुलगी स्वाती जंघेला (17) ढिगाऱ्याखाली दबलेल्याच राहिल्या. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बचावकार्यात पथकाने विहिरीतून दोन्ही मृतदेह…

Read More

नाथसागरातील बेपत्ता दुसऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला:दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या दोन

प्रतिनिधी | पैठण पैठण येथील नाथसागर धरणात रविवारी (३१ मे) पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांपैकी बेपत्ता असलेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सोमवारी (१ जून) सकाळी शोध पथकाला आढळून आला. त्यामुळे या दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सात मित्र धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. या वेळी पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संकेत सिद्धार्थ खरात (१८)…

Read More